HW News Marathi
राजकारण

अखेर शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश

नवी दिल्ली | शबरीमाला येथील आय्यपा मंदिरात अखेर दोन महिलांनी प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. आय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातल्या महिलांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. या मंदिरात प्रवेश करून बिंदु आणि कनक दुर्गा हा इतिहास रचणाऱ्या महिलांची नावे आहेत. तसेच या दोन्ही महिलांचे वय ५० वर्षापेक्षा कमी आहे.

शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यावरून निर्माण झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. यावरुन तेथील स्थानिकांनी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी महिला प्रवेशाला विरोध केला आहे. मात्र, बुधवारी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास दोन महिलांना आयप्पा मंदिरात प्रवेश केला. मध्यरात्री मंदिराच्या पायऱ्या चढण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यावेळी, या दोन महिलांसमवेत काही पोलीस गणवेशात होते, तर काही पोलीस कर्मचारी सिव्हील ड्रेसमध्ये त्या महिलांना सुरक्षा पुरवत होते. तसेच मंदिरात प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छूक महिलांना केरळ सरकारकडून पोलीस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आणि तणावाचे वातावरण

भगवान अयप्पांच्या मंदिरात कोणत्याही वयोगटतील महिलांना कोणताही भेदभाव न कराता प्रवेश द्यावा, असा आदेश २८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंर १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले होते. या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची ऐतिहासिक निर्णयामुळे येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. केरळमध्ये धार्मिक संघटनांनी आंदोलनने काढून नाराजी व्यक्त असून मंदिराबाहेर काही निदर्शने, मोर्चे आणि तणाव निर्माण झाले होते. केरळमधील निल्लकल, पंपा, एल्वाकुलम, सन्निधनम या भागात कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्यात आली होती.

यापुर्वी दोन महिलांचा मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न

मंदिरात प्रवेश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा आणि महिला पत्रकार कवीथा जक्कल या दोन महिला हेल्मेट घालून पोलिसांचे संरक्षण घेऊन त्या मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत गेल्या होत्या. परंतु या दोघींनाही मंदिरात प्रवेश करताच आला नाही. पोलिसांना निषेध करणाऱ्यांना रोखता आले नाही. त्यामुळे त्यांना दोघी निराश होऊन पुन्हा परतल्या. यावेळी मंदिराच्या मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी महिलांना परत जावे अन्यथा आम्ही मंदिराची दारे बंद करण्याचा इशारा दिला होता.

तृप्ती देसाईंचा प्रयत्न असफल

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी येत्या १७ नोव्हेंबर मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा निर्धार केला होता. यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना तृप्ती देसाई यांनी पत्र पाठविले असून, या पत्रात त्यांनी सुरक्षेची मागणी देखील केली होती. परंतु देसाई यांच्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. देसाईंना विरोध करण्यासाठी केरळमधील नागरिकही विमानतळाबाहेर दाखल झाले होते. महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच केरळ पोलिसांनी थांबविले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेचा माज आला असेल तर ती सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात आहे !

News Desk

ही पहा…प्रियांका गांधींची ‘प्रियांका सेना’

News Desk

बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नाही !

News Desk