HW News Marathi
राजकारण

उदयनराजे यांची भाजपमध्ये वापसी ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मुख्यमंत्र्याच्या भेटी नंतर माध्यमांशी बोलताना, जनता हाच माझा पक्ष आहे, जनता सांगेल तरच मी निवडणूक लढवणार, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे उदयनराजे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली आहे.कारण, यापूर्वीही भाजप सरकारमध्ये उदयनराजेंनी मंत्रीपद सांभाळले होते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली.त्यामुळे उदयनराजे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.सगळ्या पक्षात माझे मित्र आहेत असं उदयनराजे कायम सांगतात. तसेच त्यांची काम करण्याची एक वेगळी शैली असल्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे उदयनराजेंचं एक स्वतंत्र संस्थानच आहे. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर उदयनराजे पुढे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात हजेरी लावली होती. तर, पवारांनी फसवाफसवी करु नये, असे उदयनराजे यांनी म्हटले होते. तसेच उदयनराजेंच्या उमेदवारीला साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वाढता विरोध लक्षात घेता, उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकीची करणार घोषणा

Aprna

महाराष्ट्राचा विकास का घसरतो याचीच टोचणी !

News Desk

“राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच देशमुख आणि मलिकांना भेटणार”, कंबोज यांचे खळबजनक ट्वीट

Aprna
महाराष्ट्र

अंघोळीची गोळी संस्थेला ‘दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Gauri Tilekar

पुणे | दिव्या फाऊंडेशन, बुलढाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाजभान जपणाऱ्या तरुणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असतो. प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन या विषयावर सातत्याने काम करत आहे. याच कामांची दखल घेत दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने देण्यात येणारा दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ‘अंघोळीची गोळी’ संस्थेला नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन करणाऱ्या या तरूणाईचा होणार गौरव होणार आहे.

झाडांना देखील संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी मोहीम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरु केली होती. अगदी अल्पावधीतच ही मोहीम व्यापक पद्धतीने महाराष्ट्रभर पसरली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडे ही मोहीम आज सुरु आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरु केलेली अंघोळीची गोळी ही संस्था सध्या प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करून पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे.

“पुरस्कार मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अंगिकार करणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मुंबईच्याअंघोळीची गोळी टीम म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणुन साजरा व्हावा यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Related posts

१०० % उपस्थितीती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट

News Desk

अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी! – उद्धव ठाकरे

Aprna

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी कालवश

News Desk