HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण कुठे अडलंय | खासदार उदयनराजे भोसले

पुणे | मराठा आरक्षणाला पाठींबा देत आज खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, तर मग इतकी वर्ष हा प्रश्न का सुटला नाही? ५८ मूक मोर्चे निघाले पण तरीही मराठा आरक्षण लांबवलं. त्याचवेळी तातडीने पावलं उचलली असती, तर आज अनेकांचे जीव गेले नसते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं आम्ही म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असं उदयनराजे म्हणाले. सर्व राजकर्ते म्हणतात आरक्षणाबाबत आम्हाला काहीच हरकत नाही मग आरक्षणापासून वंचित समाजाला आरक्षण का मिळत नाही? असा सणसणीत प्रश्न विचारात सरकारची इच्छाशक्ती नाही किंवा राजकारणाशिवाय इथे दुसरा मुद्दा असूच शकत नाही, असे बोलून त्यांनी सरकारवर टोला लगावला. यावेळी ‘आंदोलकांवरील खटले मागे घ्या नाहीतर भडका होईल’, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. मागील कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. मग लोकांचे जीव जाण्याची वाट सरकार पाहत होतं का? अद्याप मराठा, मुस्लिमांना आरक्षण का मिळाले नाही, असे म्हणत कुटुंबातील एका व्यक्तीने आत्महत्या करून मग कुटुंबियांना पैशांची मदत आणि नोकरी देण्यात काय अर्थ आहे.
मागेच हा प्रश्न मार्गी लावला असता तर आज आरक्षणासाठी जीव गमावण्याची वेळ आली नसती, असे त्यांनी सांगितले. अनेकांना वाटतं आंदोलकांना कोणीही प्रवृत्त केलेलं नाही, परिस्थितीच अशी आहे की, इतर पर्याय नाही त्यामुळे आता आश्वासनं देऊन काहीही होणार नाही. लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने यासाठी पुढाकार घ्यावा, लोकप्रतिनिधींनी विसरू नये की, हिच सामान्य माणसं आपल्याला निवडून देतात. जर घटना लिहिणारे माणूस होते तर घटनेत दुरुस्तीही माणसंच करतात मग या मुद्द्याकडे दुर्लक्ष का? असे म्हणत सरकारने हा मुद्दा किती लांबणीवर टाकणार हे सांगावे आणि आरक्षणापासून वंचित समाजाला लवकर आरक्षण मिळवून द्यावं असं ते म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, राऊतांचा आरोप

Aprna

शिवाजी पार्क नुतनीकरणाच्या प्रकल्पात आदित्य ठाकरे-राज ठाकरे आमनेसामने

News Desk

चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार आज राज्यपालांना भेटणार

News Desk
देश / विदेश

सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

swarit

श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील सोपोर येथे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान खालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. या परिसरात दहशतवादी दहशतवाद्यांचा शोध मोहीम सुरू केली आहे.

सोपोरमध्ये द्रुसु गावात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना गुरुवारी रात्री मिळाली होती. यानंतर रात्री उशिरापर्यंत जवान शोध मोहीम सुरू केली. शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

या चकमकीमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले.या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पुलवामा आणि दुसरा सोपोरमधील रहिवासी होते. काही दिवसापूर्वी पुलवामामधून एक तरुण बेपत्ता झाल्याचे म्हटले जात होते.

Related posts

भाजपमुक्त गुजरात करणार – युवा नेता हार्दिक पटेलची गर्जना

News Desk

‘महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?’- संजय राऊत

News Desk

घर, दुकानांमधून जाते रेल्वेगाडी! video

News Desk