HW News Marathi
राजकारण

आम्ही केवळ ४८ तास मागितले, त्यांनी ६ महिने दिले !

मुंबई | राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने अखेर राज्यपालांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत कोणताही पक्ष सरकार स्थापन करू न शकल्याने राज्याला या राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या शक्यता आहेत. मात्र, राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत या तिन्ही पक्षांचा निर्णय होऊ न शकल्याने हा तिढा कायम राहिला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी “पुढच्या काळात आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र बसू आणि काय तो निर्णय घेऊ”, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • शिवसेनेने अधिकृतपणे ११ नोव्हेंबर रोजी काँग्रेस-राष्ट्रवादीशी संपर्क केला
  • “आम्ही सरकार बनवू इच्छतो. पण, आम्हाला ४८ तासांची मुदत हवी”, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली.
  • “पण राज्यपालांनी ४८ तासांऐवजी ६ महिन्यांचीच मुदत दिली”
  • पुढच्या काळात आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र बसू आणि काय तो निर्णय घेऊ
  • आता आम्हाला खूप मुदत मिळाली आहे.
  • आम्ही किमान सामान वाटप कार्यक्रमावर चर्चा करू, निर्णय घेऊ
  • राष्ट्रपती राजवट लावण्यावर उद्धव ठाकरेंची टीका
  • ‘त्या’ भिन्न विचारांच्या पक्षांच्या, अनैसर्गिक आघाड्यांचा अभ्यास करू. त्यानंतर निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
  • एवढी दयावान व्यक्ती राज्याला राज्यपाल म्हणून मिळाली नाही, उद्धव ठाकरेंचा राज्यपालांना उपरोधिक टोला
  • हिंदुत्त्व आमची विचारधारा
  • महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे म्हणजे विरोध नव्हे
  • आमचे मित्र चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता आमच्या मित्राने शुभेच्छा दिल्या म्हणजे आम्हाला सत्तास्थापन केलीच पाहिजे.
  • मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याबद्दल अरविंद सावंत यांचे अभिनंदन.
  • राजकारण आहे, एवढी घाई कशासाठी ?
  • आमच्याकडे भाजपचा पर्याय होता, त्यांनीच तो संपवला.
  • युती संपली असेल तर ती त्यांनी संपवली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांचा कर्नाटकात समावेश?, बोम्मईंचे मोठे वक्तव्य

Aprna

राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याची भाजपने उडवली खिल्ली

News Desk

सावधान ! काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी !

News Desk