HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : उद्धव ठाकरेंमुळेच मराठा आंदोलकांचे उपोषण मागे ?

मुंबई | मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून गेले तब्बल १० दिवस मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज जरी मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालेले असले तरी आरक्षणाच्या अध्यादेशावर जोपर्यंत राज्यपाल स्वाक्षरी करीत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार मराठा उपोषणकर्त्यांनी केला होता. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय मराठा उपोषणकर्त्यांनी केले आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहे.

दरम्यान, आज मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक होत असताना शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे म्हणत सर्व श्रेय घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाबाबत सरकारकडे वारंवार मागण्या केल्यानेच हे यश मिळाल्याचे शिवेसनेने म्हटले आहे.

त्यानंतर “काही राजकारण्यांकडून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहेत. परंतु, यासाठी ४० जणांनी दिलेले बलिदान लक्षात ठेवावे. मात्र, ही श्रेय घेण्याची वेळ नाही. आपण केवळ आपली जबाबदारी पार पाडली आहे,” असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले होते.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आताचे अन् विधानसभेनंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

News Desk

#21daysLockdown | देशातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद

News Desk

केसीआर घेणार ममता बॅनर्जी यांची भेट

News Desk
मुंबई

लक्ष्यवेधचा ३६ वा “लक्षसिध्दी सोहळा” दिमाखात संपन्न

News Desk

मुंबई | लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स या संस्थेने ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याचे आयोजन केले होते. नुकताच हा लक्षवेध चा “लक्षसिध्दी सोहळा” मैसुर असोसिएशन सभागृह माटुंगा येथे पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनएसडीएल (NSDL) या संस्थेचे उपाध्यक्ष मनोज साठे हे उपस्थित होते. या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये लक्षवेध संस्थेचे सर्वेसर्वा अतुल राजोळी यांनी मनोज साठे यांच्या सोबत “समृद्धीचा राजमार्ग” ह्या विषयावरील चर्चासत्र घेतले. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या मनातील प्रश्न त्यांना विचारले.

“आयुष्यात तुम्ही किती पैसे कमावता ही गोष्ट महत्वाची नसते. समृद्धीचा राजमार्ग जर तुम्हाला मिळवायचा असेल तर “वा, वा, वा, वा” या तत्वाला आत्मसात करा. ह्या तत्वामधील पहिला ‘वा’ म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे वाचवायला शिका, दुसरा ‘वा’ म्हणजे वाढ तुम्ही कमवलेले पैसे काही प्रमाणात गुंतवा जेणे करून त्यामध्ये वाढ होईल. तिसरा ‘वा’ म्हणजे पैश्यांचा वापर करा जेणे करून अर्थव्यवस्था प्रवाहात राहील आणि चौथा शेवटचा ‘वा’ म्हणजे पैसे वाटायला शिका तुमच्या कडील अधिक पैसे गरजू व्यक्तींमध्ये किंवा सामाजिक कार्यासाठी त्याचा वापर करा . हे तत्व तुम्ही पाळलेत तर यश नक्कीच तुमचे होईल’’ असे बहुमूल्य मार्गदर्शन मनोज साठे यांनी ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये उद्योजकांना केले.

व्यावसायिकांना दिग्गज वक्त्यांकडून मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची व्यावसायिक वृद्धी व्हावी म्हणूनलक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स असे परिसंवाद घेत राहील असे लक्षवेध चे संस्थापक अतुल राजोळी यांनी सांगितले. ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 

Related posts

बाप्पाच्या दर्शनापासून भाविक पाच दिवस वंचित

News Desk

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

News Desk