HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : उद्धव ठाकरेंमुळेच मराठा आंदोलकांचे उपोषण मागे ?

मुंबई | मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून गेले तब्बल १० दिवस मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज जरी मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालेले असले तरी आरक्षणाच्या अध्यादेशावर जोपर्यंत राज्यपाल स्वाक्षरी करीत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार मराठा उपोषणकर्त्यांनी केला होता. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय मराठा उपोषणकर्त्यांनी केले आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहे.

दरम्यान, आज मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक होत असताना शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे म्हणत सर्व श्रेय घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाबाबत सरकारकडे वारंवार मागण्या केल्यानेच हे यश मिळाल्याचे शिवेसनेने म्हटले आहे.

त्यानंतर “काही राजकारण्यांकडून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहेत. परंतु, यासाठी ४० जणांनी दिलेले बलिदान लक्षात ठेवावे. मात्र, ही श्रेय घेण्याची वेळ नाही. आपण केवळ आपली जबाबदारी पार पाडली आहे,” असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले होते.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Breaking News | रोहित पवार-रविकांत तुपकरांची बंद दाराआड चर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ जागांवर ठाम

News Desk

प्रज्ञा ठाकूर यांना पुन्हा न्यायालयाचा दणका

News Desk

…नाहीतर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही !

News Desk