HW News Marathi
राजकारण

उध्दव ठाकरेंना अयोध्येत होतोय विरोध 

मुंबई | राम मंदिर उभारणीसाठी अनेक हिंदू संघटना पुढे सरसावल्या आहेत. यासाठी येणाऱ्या काळात अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेने धर्मसभा आयोजित केल्या आहे. या धर्मसभेला विरोध करण्यात आला आहे. डिसेंबर १९९२ मध्ये घडलेल्या घटनेसारखी घटना पुन्हा घडू नये. यासाठी हा विरोध होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे २४ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहे. मात्र उध्दव ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार असल्याचे व्यापारांनी सांगितले आहे.

व्यापार मंडळाचे अध्यक्ष जनार्दन पाण्डेय म्हणाले की, ‘फैजाबाद किंवा अयोध्येतील शांतता भंग करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आगामी काळात येथील वातावरण तणावपूर्ण राहील या शक्यतेने दोन्ही शहरांतील लोक चिंतेत आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लिम कुटुंबांनी अन्नधान्याचा आतापासूनच साठा करण्यास सुरुवात केली आहे.’

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीमुळे देशाचे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचाही मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राम मंदिराच्या प्रश्नावरुन विश्व हिंदू परिषदेच्या हालचाली पाहता येथील वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अयोध्येमध्ये हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केली होती. यामुळे बरेच दिवस अयोध्येत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यापाऱ्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“ताई, मी सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो”, मुख्यमंत्र्यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

Aprna

“…भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये”, सामनातून काँग्रेसला सल्ला

Aprna

राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली ?, अमित शहांचा सवाल

News Desk
देश / विदेश

अमृतसर रेल्वे अपघातासाठी नागरिकच जबाबदार, सीसीआरएसचा अहवाल

News Desk

नवी दिल्ली | पंजाबमधील अमृतसर येथे जोड फाटक येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीला भरधाव आलेल्या रेल्वेने धडक दिली. या भीषण अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात नेमकी चूक कोणाची यावर अनेक उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली असून रेल्वे रुळावर उभ्या असणाऱ्या लोकांनाच जबाबदार ठरविण्यात आले आहे.

अमृतसर येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उपस्थित असलेल्या लोकांचा निष्काळजीपणाच त्यांच्या मृत्युचे कारण ठरला आहे, असे सीसीआरएसच्या अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे यापुढे कुठल्याही रेल्वे क्रॉसिंग लाईनजवळ जत्रा, कार्यक्रम, आंदोलन किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास सर्वप्रथम स्थानिक रेल्वे प्रशासनाला त्याबाबतची माहिती देण्यात यावी म्हणजे रेल्वे अधिकाऱ्यांना त्यावेळच्या रेल्वेच्या वेळेमध्ये गरजेनुसार बदल करण्यात येईल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

क्राइम सीरिअल पाहून तिघांनी लुटली बँक, टॅटूवरून चोरीचा छडा

News Desk

अटलजींनी नेहरूंचा हटवलेला फोटो पुन्हा लावायला सांगितला…. आज अटलजींची जयंती !

News Desk

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या घटनापीठाची स्थापना

News Desk