HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनले, जावडेकरांची टीका

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनले, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील ३७० रद्द केल्यानंतर केलेले विधान मनापासून नव्हते. तर नव्हे तर परिस्थितीमुळे घुमजाव केला, अशी टीकास्त्र जावडेकरांनी राहुल गांधीवर सोडले. राहुल यांच्या वक्तव्याचा आधार घेत पाकिस्तानने भारताविरोधता संयुक्त राष्ट्र संघात तक्रार दाखल केली. यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधींनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी जावेडकरांनी आज (२८ ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

राहुल गांधींनी काश्मीरच्या नावाने व्होटबँकेचे राजकारण करत असल्याचा आरोपही जावडेकर यांनी यावेळी केला. वायनाडमध्ये निवडून आल्यानंतर राहुल यांच्या भूमिकाही बदलल्यात का? असा सवाल करतानाच ज्यांनी देशात आणीबाणी लागू केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही जावडेकर यांनी राहुल गांधींना हाणला. राहुल यांना जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यास मनाई केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना काश्मीरमधील लोक किती यातना सोसत असतील याचा मला अंदाज येत असल्याचे राहुल यांनी म्हटले होते.

राहुल यांनी ट्वीट करत म्हटले की, “‘माझे भाजप सरकारसोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, हे मी स्पष्ट करतो. यामध्ये पाकिस्तान किंवा इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात पाकिस्तानसह चीन आणि अमेरिकेलाही इशारा देईल आहे.’ दुसऱ्या ट्वीट म्हटले की, “जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा झाली आहे. कारण जम्मू काश्मीरमधील नागरिकांना भडकवले जात असून पाकिस्तानचा या सर्वाला पाठिंबा मिळत आहे. या पाकिस्तानची जगभरात दहशतवादाचा मुख्य समर्थक अशी ओळख आहे.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RamMandir : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेत कायदा करा, उद्धव ठाकरेंचे मोदींना अल्टीमेटम

News Desk

भारत माझा देश आहे… बांगलादेशी आणि पाकिस्तानी घोसखोरांचा नाही !

News Desk

पवारांनी मराठ्यांना केले शांततेचे आवाहन

News Desk