HW News Marathi
राजकारण

ना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान !

लखनऊ | गेल्या काही दिवसांपासून भगवान हनुमान हे नेमक्या कोणत्या जातीचे आहे. यावरून उत्तर प्रदेशात चांगलेच राजकारण पेटले आहे. या वादात आता उत्तर प्रदेशमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी म्हटले की, ”जाट हे भगवान हनुमानाचे वंशज आहेत”, असे वादग्रस्त विधान केले आहे. याआधी उत्तर प्रदेशमधील विधान परिषदेचे भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे वादग्रस्त विधान केले आहे.तर आता आणखी एका मंत्र्यांने हनुमान हे जाट समाजातील होते, असा दावा केला आहे.

याआधी उत्तर प्रेदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचे वक्तव्य केले होते. जैन धर्मगुरू आचार्य निर्भय सागर महाराज यांनी, हनुमान हे जैन होते, असा दावा केला होता. हनुमान यांच्या जातीवरून वेगवेगळे दावे केले जात असल्याने आता नव्यावादाची ठिणगी पडली आहे. या वादात हनुमान यांचे नाव रोज एका जातीशी जोडले जात आहे.

नारायण चौधरी नेमके काय बोलेले

”जाट हे भगवान हनुमानाचे वंशज आहेत”, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशमधील धार्मिक व्यवहार मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केले आहे. ‘भगवान श्रीराम यांची पत्नी देवी सीता यांचे रावणाने अपहरण केले. त्यानंतर हनुमान यांनी लंकेचे दहन केले. ज्यावेळी कोणावर अन्याय होतो तेव्हा तिथे जाट हस्तक्षेप करतात. हा जाट समाजाचा नैसर्गिक गूण आहे. हनुमान देखील देवी सीतेच्या रक्षणासाठी धावून गेले. यामुळे हनुमान हे जाट असल्याचे सिद्ध होते, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर सगळाच मामला थंड; सामनातून राज्य सरकारवर टीका

Aprna

एकनाथ शिंदेंनी आमदारांचे भावनिक पत्र केले ट्वीट

Aprna

केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांनाच शिवसेनेच्या नेत्यांची नावे शोभतील !

News Desk
व्हिडीओ

या देशात आता असंच घडणार…

swarit

देशातील बहुचर्चित सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणाचा शुक्रवारी १३ वर्षानंतर निकाल लागला आहे. या निकालावरुन राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाना साधला आहे. या प्रकरणासाठी न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्याची आवशकता नव्हती निकाल काय येणार हे सर्वांनाच ठाउक होते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Related posts

“काहीही बोला, पण आई-वडिलांवर जाऊ नका”; लोकसभेत Supriya Sule संतापल्या

News Desk

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वरील महिला पोलीस कोरोना ‘पॉझिटिव्ह’

Gauri Tilekar

“BJP जवळ जाणाऱ्या नेत्याला संपवलं जातं, Raj Thackeray जरा जपून”; Rohit Pawar यांचा सल्ला

News Desk