HW News Marathi
राजकारण

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

लखनौ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचे वादग्रस्त विधान केल्यानंतर या प्रकरणाची राजकारणात जोरदार चर्चा रंगलेली होती. हे प्रकरण शांत होत असतानाच आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांच्या संदर्भात एक धक्कादायक विधान केले आहे. ‘हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते’ असल्याचे साय यांनी म्हटले आहे.

अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असते. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे. ज्याचा अर्थ वानर असा होतो. तसेच अनुसूचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्रे आहेत, असे साय यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीरामाने ज्या दंडकारण्यात सैन्य गोळा केले. त्यामध्ये अनुसूचित जातींचे लोक होते. त्यामुळे हनुमान हे दलित नव्हे तर अनुसूचित जातीचे होते, असे नंदकुमार साय यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; होणार थेट प्रक्षेपण

Aprna

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat

जी आग तुमच्या मनात आहे तीच माझ्याही मनात !

News Desk
मुंबई

एलएलएम’च्या परीक्षा पुढे ढकला,विद्यार्थी कोर्टात जाणार

swarit

मुंबई विद्यापीठाच्या ‘एलएलएम’च्या परीक्षा वर्ग सुरू झाल्यानंतर ११ दिवसांनी घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अभ्यास कधी करणार आणि परीक्षा कशी देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकला अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा स्टुडंट लॉ कौन्सिलने दिला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ‘एलएलएम’ प्रवेशाची शेवटची प्रवेश यादी १० जानेवारीला प्रसिद्ध झाल्यानंतर १७ जानेवारी रोजी सत्र-१ची परीक्षा ठेवण्यात आली. मात्र विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर ही परीक्षा २२ जानेवारीपासून घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. तरीदेखील फक्त ११ दिवसांत अभ्यास करून परीक्षा देणे कठीण असल्याचे सांगत या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा याआधी स्टुडंट लॉ कौन्सिलने याआधीच दिला आहे. यातच आता या परीक्षा पुढे ढकलल्या नाही तर न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.

Related posts

सभागृहात असे कधीच घडले नाही

News Desk

मुंबईत पेट्रोल नव्वदी पार

News Desk

डोंबिवलीमध्ये शारदा प्रोसेस कंपनीच्या चार मजली गोदामाला आग

News Desk