HW News Marathi
राजकारण

आमच्या उमेदवारांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच !

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दणदणीत पराभव सहन कराव्या लागलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आता वंचित बहुजन आघाडीने आपल्या अपयशाचे खापर फोडले आहे. राज्यात काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीमुळे जोरदार फटका बसला, अशी चर्चा एकीकडे राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे “काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला”, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून केला गेला आहे.

काँग्रेसच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडी जबाबदार असल्याचा आरोप केला जात असला तरीही त्यात तथ्य नसून काँग्रेस त्यांच्या कर्तृत्वाने संपली आहे”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. “वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगली मते मिळाली आहेत. अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार अगदी विजयाच्या जवळ देखील पोहोचले होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने आमची मते खाल्ली. त्यामुळे आमचे उमेदवार पराभूत झाले. मुंबईत मात्र आमचा प्रचार कमी पडला, हे मान्य करतो. परंतु, विधानसभेत असे होणार नाही”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव !

News Desk

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे !

Gauri Tilekar

दुष्काळी दौऱ्यात सत्कार स्वीकारणार नाही !

News Desk