HW News Marathi
राजकारण

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात कायदा सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षा दल पाठवा”, संजय राऊतांची मागणी

मुंबई | “महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात कायदा सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षा दल फौज पाठवा”, अशी मागणी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे केली आहे. दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे अमित शाहांचे भेट घेणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (14 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी ही मागणी केली. तर अमित शाहा हे कोल्हापूरचे जावाई असून सीमा भागाचे सर्वात जास्त चटके हे कोल्हापूरला बसत आहेत, अशी ही आठवण त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अमित शाह मध्यस्थी करणार का?, असा सवाल पत्रकारांनी संजय राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “यासंदर्भात मध्यस्थिती ही पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी करावी. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. आणि संपूर्ण कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. पण, बोम्मई असे म्हणतात, अमित शाहांना बेटून काही फायदा नाही. हे भाजपचे मुख्यमंत्री सांगत आहेत की अमित शाहांना भेटून काही फायदा नाही. आणि आम्ही म्हणतोय, फायदा आहे. ते गृहमंत्री आहेत. हा संपूर्ण भाग केंद्र शासित करण्याचा अधिकार हा गृहमंत्र्यांना आहे. किंवा त्या भागात बेळगाव, निपाण, कारवारसह 56 गावे आहेत. तिकडे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री धुडघूस घालत आहेत. तेथील राज्य दलाचा पोलीस दलाचा फौज फाटा मागे काढून कायदा सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षा दल  फौज पाठवा. हे केंद्रीय गृहमंत्री करू शकतात. त्यानंतर भाषेसंदर्भात जे आयोग आहेत. किंवा ज्यांना आपण अल्पसंख्यांक आयोग म्हणतो. कर्नाटकमध्ये तो संपूर्ण भाग मराठी लोक हे तिथे अल्पसंख्यांकमध्ये येतात. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे पूर्णपणे केंद्राला आहेत. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यासंदर्भात आदेश देण्याचे अधिकार हे गृहमंत्र्यांना आहेत. त्यामुळे गृहमंत्री जर खरोखर मध्यस्थी करत असतील. आणि त्यातून काही सकारात्मक निर्णय होणार असेल, तर त्यावर टीका करण्याचे काही कारण नाही.”

सीमा भागाचे सर्वात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात

“गेल्या 70 वर्षापासून त्या भागातील मराठी बांधवावर अन्याय होतोय. नुसता अन्याय नाही, त्यांना चिरडले जात आहे. त्यासंदर्भात तुम्ही निर्णय घ्या, प्रश्न इतिकाच आहे. गृहमंत्री महाराष्ट्राचे जावाई आहेत. हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत. आणि सीमा भागाचे सर्वात जास्त चटके हे कोल्हापूरला बसत आहेत. सगळ्यात मोठा संघर्ष हा कोल्हापूरात होतो. कारण सीमा आहेत. त्यामुळे या प्रश्नासंदर्भात त्यांना जास्त माहिती आहे,” असे आवाहन संजय राऊतांनी अमित शाहांना दिली आहे.

न्यायालय सलग सुनावणी लावून राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतो

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायालयात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी  संजय राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “न्यायालयात अनेक प्रकरण आहेत. म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का?, संसदेत बोलायचे नाही का?, न्यायालय सलग सुनावणी लावून राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतो. कारण तो राजकीय प्रश्न बनला. पण, 20-25 लाख मराठी बांधवांचा प्रश्न न्यायालय तारखांवर तारखा देत आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च न्यायालयाकडून शरद पवारांना दिलासा

News Desk

राहुल गांधींचे मोदींना दोन प्रश्न

News Desk

मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार! – उपमुख्यमंत्री 

Aprna