HW News Marathi
राजकारण

विखे पाटील यांचे संपूर्ण कुटुंब आता भाजपमय झाले आहे !

मुंबई | “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटलमेंट झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस आणि विखे पाटील यांचे प्रेम राधाकृष्णाच्या प्रेमासारखे आहे. विखे पाटील यांचे संपूर्ण कुटुंब आता भाजपमय झाले आहे”, अशा कठोर शब्दात अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. बच्चू कडू हे सोमवारी (१० जून) जामखेड येथे आयोजित सभेत बोलत होते.

“यंदाच्या लोकसभा निवडणूकीचे निकाल पाहता जनतेने नेमका कोणता विचार करून मतदान केले, याबाबत मला आश्चर्य वाटते. शेतक-यांसाठी काम करणारा राजू शेट्टींसारख्या खासदाराचा पराभव होतो आणि शेतक-यांसाठी अपशब्द वापरणाऱ्या रावसाहेब दानवेंसारखा व्यक्ती निवडून येतो. ज्या नगरमध्ये ऊसाच्या दरासाठी लढणा-यांवर गोळ्या झाडल्या जातात त्याच नगरमध्ये कमळ कसे खुलते ? भाजपचा विजय कसा होतो ?”, असाही प्रश्न बच्चू कडू यांनी केला आहे. “असेच चालू राहिले तर आमच्यासारखा कार्यकर्ता टिकणार नाही”, अशी भीतीही सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी नियमांचे उल्लंघन

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…कल्याण मतदारसंघाबाबत

Atul Chavan

आम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा ! 

News Desk