HW News Marathi
राजकारण

कोणत्याही पक्षाचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत !

नवी दिल्ली | देशभरात आज (२३ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह १४ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात देखील देशभरातून मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ईव्हीएमविषयी गंभीर आरोप केले आहेत. कोणत्याही पक्षाचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत जात असल्याचा आरोप थरूर यांनी केला आहे.

शशी थरूर यांनी आज तिरुअनंतपुरम येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान केल्यानंतर थरूर यांनी हा आरोप केला आहे. देशभरात एकूण १४ राज्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर महाराष्ट्रात एकूण १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, अनेक मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदान यंत्रातील बिघाडामुळे मतदात्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान, देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार असून २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर बेस्ट कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईलने मिळवून देणार न्याय !

News Desk

माझे नरेंद्र मोदींवर प्रेम मात्र त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार !

News Desk

#Vidhansabha2019 | वडिलांसाठी ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक माघार घेणार ?

News Desk