HW News Marathi
राजकारण

पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, दिग्गजांचे भवितव्य होणार सीलबंद

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (६ मे) सात राज्यामध्ये ५१ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यात ६७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. आज ८ कोटी ७५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बिकानेरमधून केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, जयपूर (ग्रामीण) येथून केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंह राठोड आदी दिग्गजांचे भवितव्य आज सीलबंद होणार आहे.

पाचव्या टप्प्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या गेल्या चार टप्प्याच्या तुलने जास्त आहे. या टप्प्यामध्ये सुमारे साडेतीन लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४ जागांवर लढाई होत असून, त्यातील १२ जागा भाजपच्या ताब्यात होत्या. सपा-बसप-आरएलडीच्या आघाडीनंतर बदललेल्या स्थितीत या जागा राखणे हे भाजपसमोर आव्हान असेल.

लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील १४ जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात तीन हायप्रोफाईल लढती रायबरेली, अमेठी आणि लखनौ या मतदार संघांमध्ये होणार आहेत. अमेठी या आपल्या पारंपरिक मतदार संघातून राहुल गांधी यांच्यासमोर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आव्हान उभे केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात उद्या अंतिम निर्णय”, अजित पवारांची माहिती

Aprna

मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता !

News Desk

ठाकरे गटाला धक्का! माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

Aprna