HW News Marathi
राजकारण

आम्ही काँग्रेसला आमच्या साडे चार वर्षांचा हिशोब देऊ इच्छित नाही !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे ‘मेक इन इंडिया’ करत आहेत, तर महाआघाडी ‘ब्रेकिंग इंडिया’ करण्यात व्यस्त आहे, असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लगावला आहे. अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “राहुल, आम्ही तुम्हाला साडे चार वर्षांचा हिशोब देऊ इच्छित नाही. कारण, तुम्हाला हिशोब मागण्याचा अधिकार नाही. तुम्ही(काँग्रेसने) चार पिढ्या सत्तेवर असून देखील देशातील गरिबांसाठी काहीही केलेले नाही,” असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

अमित शाह सिकंदराबाद येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या अधिवेशनाला संबोधित करीत होते. ‘राज्यात ओवैसीच्या भीतीमुळे केसीआर सरकारने ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ साजरा करणे बंद केले आहे. जेव्हा आम्ही सत्तेवर येऊ तेव्हा आपण हा दिवस साजरा करू, असेही अमित शाह यांनी यावेळी म्हटले आहे.

तेलंगामध्ये ८ डिसेंबर रोजी तर ११ डिसेंबर रोजी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली टीआरएस सरकारने लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुक टाळण्यासाठी ६ महिन्यांपूर्वी तेलंगाना विधानसभा विसर्जित केली होती, असे म्हटले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

News Desk

राफेलसंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधींनी देशाची माफी मागावी !

News Desk

निवडणुकीत कॉंग्रेस करणार कडेकोट बंदोबस्त

News Desk