HW News Marathi
राजकारण

नितेश यांची आक्रमकता कायम ठेऊन आम्ही त्यांना संयमाचे धडे देऊ !

कणकवली | “नितेश राणे यांचा स्वभाव मूळतः आक्रमक आहे. मात्र, आक्रमकतेसह संयमही महत्त्वाचा असतो. आता ते आमच्या शाळेत आले आहेत तर त्यांची आक्रमकता तशीच ठेऊन आम्ही त्यांना संयमही शिकवू”, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज (१५ ऑक्टोबर) भाजपामध्ये विलीन झाला. त्याचबरोबर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कणकवली भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नितेश यांच्या आक्रमतेविषयी भाष्य करत थोडा संयमही ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

“नितेश राणे आपल्या वडिल नारायण राणे यांच्याप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात जर कोणी कोकणाविषयी पोटतिडकीने बोलत असेल तर ते नितेश राणे आहेत. ते आता आमच्या शाळेत आले आहेत. त्यामुळे आता त्यांची आक्रमकता कायम ठेऊन आम्ही त्यांना संयमाचे धडे देऊ. नारायण राणे यांनी कुठे आक्रमकता दाखवायची आणि कुठे संयम बाळगायचा हे व्यवस्थित माहिती आहे. हेच जर नितेश राणे यांनी आत्मसात केले तर मला विश्वास आहे कि येत्या काळात नितेश राणे हे एक अभ्यासू नेतृत्व समोर येतील”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून नक्की विजयी होतील असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. “यंदाच्या निवडणुकीत कणकवली मतदारसंघातील एकूण मतांपैकी तब्बल ७० टक्के मते नितेश राणे यांना पडतील. हे माझे भाकीत तुम्ही डायरीत लिहून ठेवा”, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या भाजपमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरु होती. मात्र, आज अखेर राणेंचा स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही ठरवितात !

News Desk

भाजप नेत्यांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

News Desk

सवर्णांना आरक्षण दिले, आता नोकऱ्या द्या !

News Desk