HW News Marathi
राजकारण

आजच्या तारखेला निवडणुका झाल्या तर काय असेल भाजपची स्थिती ?

नवी दिल्ली | आजच्या घडीला जर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या तर मध्य प्रदेश, आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होईल. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्येही भाजपची निराशाच होण्याची शक्यता आहे, एबीपी न्यूज आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.

आजच्या तारखेला जर मध्यप्रदेशात निवडणूक झाल्या तर मध्य प्रदेशातील एकूण २३० जागांपैकी काँग्रेसला ११९ म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या जागांपेक्षा ३ जागा जास्त मिळतील. तर भाजपला मात्र मध्यप्रदेशात १०५ जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. तर येथील इतर पक्षांना सहा जागा मिळतील, असे एबीपी न्यूज आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये देखील भाजपची स्थिती फारशी चांगली नसेल, अशी माहिती या सर्वेक्षणातून मिळत आहे.

राजस्थानमध्ये एकूण २०० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणानुसार, काँग्रेस राजस्थानमध्ये सर्वात जास्त १४४ जागा मिळवून विजयी होऊ शकते तर भाजपला केवळ ५५ जागांवर समाधान मानावे लागेल. तर राजस्थानमधील एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येईल, असे एबीपी न्यूज आणि सी वोटर्स यांच्या सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा | अंजली दमानिया

swarit

‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Aprna

‘भीम आर्मी’च्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देण्यास पोलिसांचा नकार

News Desk