HW News Marathi
राजकारण

भागवत आणि मोदींकडे एके ४७ कुठून आल्या ?

मुंबई | आरएसएसजवळील शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घ्यावीत किंवा सर्व नागरिकांना शस्त्रे द्यावीत, या मागणीसाठी आंबेडकर यांनी आज मुंबईत मोर्चा काढला. सैन्य आणि पोलीस असताना नवे सैन्य कशाला? असा प्रश्न त्यांनी मोर्चाला संबोधित करताना उपस्थित केला. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे एके ४७ कुठून आल्या? याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. नागपूर पोलिसांनी या शस्त्राप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी या नकली पोलिसांना पकडावे, अन्यथा आम्हाला कोर्टात धाव घ्यावी लागेल. पोलिसांनी कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून महाराष्ट्रातील सर्व रस्ते बंद पाडू, असा इशारा आंबेडकरांनी यावेळी दिला.

मध्यप्रदेश ग्वालियर मध्ये 50 दिवसापूर्वी जी दंगल झाली ती आर एस एस ने केली. पोस्टर्स मध्ये दाखवण्यात आलेले हत्यारे दंगलीमध्ये वापरण्यात आलेले आहेत. मोहन भागवत AK 47 हत्यार आहे. तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करायला पाहिजे ? हत्यारे तर मिलिटरी यांच्याकडे असतात संविधान ने त्यांना हे अधिकार कसे दिले? नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत हत्यार ठेवणार्‍यांची नाहीत. स्वतःजवळ हात-पाय तोडणार हे मोहन भागवत यांच्यावर मोक्का लावण्यात आला पाहिजे त्यांना अटक का केली जात नाही आहे ? पोलिसांनी जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही पूर्ण ताकतीनिशी रस्त्यावर उतरून. हत्यारे घेऊन आर एस एस ने नवीन सेना उभी केली आहे. आम्हाला नकली पोलीस नको, त्यांना पकडा त्यांच्यावर कारवाई करा.

मलाही AK 47 द्या, आम्हालाही ट्रेनिंग द्या, देशांमध्ये काय तमाशा चालू आहे तो बंद झाला पाहिजे.

आर एस एस किंवा सनातन किवा अन्य कोणत्याही पक्ष असु दे आम्हाला ते माहित नाही त्यांनी संविधानाचा अपमान केला आहे कायदा सर्वश्रेष्ठ आहे तो सर्वांसाठी समान आहे तर सरकारला आम्ही इशारा देतो की त्यांना लवकरात लवकर हत्यारानिशी पकडा, हत्यारे जमा करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. या सरकारची हिटलर शाही चालू आहे, सत्ता जाण्याची आता वेळ आली आहे तर त्याचा पहिला वारा पोलिसांवर होईल हे सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे.

पोलिसांवरच शस्त्रे उगरातील –

आरएसएस आणि इतर संघटना खुलेआम शस्त्र वापरत आहेत. या शस्त्राद्वारे लोकांना भयभीत केले जाईल. यांचे सरकार पडणार असे समजले, तर हेच लोक पोलिसांवर शस्त्रे उगरातील, असा इशाराही आंबेडकरांनी यावेळी दिला. न्यायालय कारवाई का केली नाही? असा प्रश्न विचारणार मुख्यमंत्र्यांना नाही तर पोलिसांना विचारणार आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा सरकार बदलले तर पोलिसांना डिसमिस केल्याशिवाय राहणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.

देशाच्या सुरक्षेसाठी सैन्य आणि पोलीस यंत्रणा आहे. या यंत्रणांकडे देशाची सुरक्षा करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे असतात. मग संघप्रमुख मोहन भागवत यांना अत्याधुनिक शस्त्रे का लागतात? असा प्रश्न उपस्थित करत भागवतांना मोक्का लावावा, अशी मागणी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी यांची आज मुंबईत जाहीर सभा

News Desk

राम मंदिर प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे संपूर्ण देश पालन करेल !

Gauri Tilekar

पहा…मुलींनंतर आता डास पळविणार आमदार राम कदम

News Desk