HW News Marathi
राजकारण

उमेदवारांवर पाच गुन्हे असले तरी तो जिंकणार हवा !

भोपाळ | मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि छिंदवाडामधून खासदार असलेल्या कमलनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या मध्य प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या व्हिडीओमुळे मध्य प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले चित्र दिसत आहे. या व्हिडीओ भाजपच्या मध्य प्रदेश ट्विटर अकाउंटमध्ये शेअर केला आहे. “उमेदवारावर एक किंवा पाच गुन्हा असो, त्याच्यावर कितीही गुन्हे दाखल असेल तरी काही फरक पडत नाही, पण आपल्याला उमेदवार जिंकणाराच हवाय,” असे वादग्रस्त विधान कमलनाथ यांनी या व्हिडीओमध्ये केले आहे.

मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. “ही जर काँग्रेसची रणनिती आहे, तर जनता समजूदार आहे. जनता २८ नोव्हेंबरला मतदान करून कोणाला विजयी करेल ते,” चौहान यांनी म्हटले आहे. चौहान यांचे मेव्हणे संजय सिंह मसानी यांनी शनिवारी (३ नोव्हेंबर)ला काँग्रेसमध्ये प्रवेश करून चौहान यांना मोठा धक्का दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपायला हवा !

News Desk

उध्दव ठाकरेंना अयोध्येत होतोय विरोध 

News Desk

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या | खा. अशोक चव्हाण

News Desk
राजकारण

यंदाच्या दिवाळीत एक दिवा श्रीरामाच्या नावाने पेटवा !

Gauri Tilekar

नवी दिल्ली | ‘यंदाच्या दिवाळीत एक दिवा श्रीरामाच्या नावाने पेटवा, लवकरच काम सुरू होणार आहे. दिवाळी झाल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचे पाहू’ असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. अयोद्धा राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला असताना योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ राजस्थान मधील एका कार्यक्रमात बोलत होते.

“राम मंदिराचे प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकरात लवकर यावर निर्णय यावा अशी आमची इच्छा आहे’, असे केंद्रीय मंत्री पीपी चौधरी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे जर न्यायालयाच्या निकालासाठी वेळ लागणार असेल तर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी वैयक्तिक मागणी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अयोध्या राम मंदिराचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असताना सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केवळ मतांचे राजकारण करीत असताना दिसत आहे.

Related posts

युतीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिला हा इशारा

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

शिवसेनेच्या 12 खासदारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री सायंकाळी घेणार पत्रकार परिषद

Aprna