HW News Marathi
राजकारण

‘रिव्हर अँथम’मुळे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या प्रदुषणमुक्त झाल्या ?

मुंबई | “आषाढी वारीच्या तोंडावर देहू नगरीतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली गाणी गाण्यापेक्षा नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी एखादा ठोस कार्यक्रम हाती घेतला असता तर ही घटना झाली नसती”, अशी बोचरी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. इंद्रायणी नदीत मृत मासे सापडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत बोलत होते.

“आषाढीवारीनिमित्त लाखो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करत असतात. मात्र, नदीत मैलायुक्त सांडपाणी व रासायनिक पाणी सोडले जात असल्यामुळेच या नदीचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. अशा प्रदुषित पाण्यात वारकऱ्यांनी स्नान कसे करायचे ?”, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.

“रिव्हर अँथमच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांना संगिताच्या तालावर ठेका धरायला लावला. यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री कार्यालयाने नद्यांसंदर्भात अनेक स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन रिव्हर ऍथॉरिटी स्थापन करू असे म्हटले होते. त्याचे काय झाले ? रिव्हर अँथम हा केवळ करमणुकीचा भाग होता का ?”, असेही सावंत यांनी विचारले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधान परिषदेत ‘मविआ’च्या पदरी निराशा; मलिक, देशमुख मतदानापासून वंचित

Aprna

मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखतं ?

News Desk

संजय शिंदे यांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश, माढ्यातून उमेदवारी देखील मिळणार ?

News Desk