HW News Marathi
राजकारण

मुंबईतील डांबरी रस्त्यांची आवश्यकता असेल तर चौकशी करु उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई | मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? याची चौकशी करा, अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानसभेत केली. तर आवश्यक असेल तर चौकशी करु, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले. मुंबईतील अंधेरी पूर्वच्या पुलाच्या कामाबद्दल लक्षवेधी सूचना आज (20 डिसेंबर) विधानसभेत भाजपा आमदार सुनील राणे यांनी मांडली होती. यावर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील डांबरी रस्त्याच्या विषयाकडे लक्ष वेधले.

 

या प्रकरणी आपल्या भाषणात टीका करणारे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या संशयाचे जोरदार खंडन आशिष शेलार यांनी केले. हा पुल धोकादायक झाला असे प्रशासन सांगते तेव्हा त्याची पुनर्बांधणी करा अशी मांगणी करणारे पत्र स्थानिक आमदार म्हणून अमित साटम यांनी दिले असेल, तर त्याची कसली चौकशी करणार? असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी चौकशीच करायची असले तर गेल्या २५ वर्षांत झालेल्या डांबरी रस्त्यांमध्ये आणि पुलांच्या डांबरीकरणाची चौकशी करा, मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचा डांबर कोणी खाल्ले? कोल्ड मिक्स आणि हाँट मिक्स याची चौकशी करा अशी आग्रही मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

दरम्यान, याची तातडीने दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी वस्तुस्थिती लक्षात घेऊन आवश्यक असेल तर चौकशी करण्यात येईल. सरकार कुणालाही टार्गेट करणार नाही तसेच कुणालाही पाठीशी घालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या हस्तक्षेपामुळे सुब्रम्हण्यम स्वामी नाराज

Gauri Tilekar

“आगे आगे देखो होता है क्या” मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान, दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश

News Desk

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर 

News Desk