HW News Marathi
राजकारण

ज्यांच्या रक्तात भारत आहे ते एअर स्ट्राइकवर संशय घेतील का ?

नवी दिल्ली | “भारतीय वायू दलाच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात मोदींनी दहशतवाद्यांना मारले असे बोलले जात होते. परंतु भारतात मात्र काही लोक या हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. “जे भारत माता की जय म्हणतात, ज्यांच्या रक्तात भारत आहे ते एअर स्ट्राइकवर संशय घेतील का ? जे लोक स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करतील त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का ?”, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना विचारला आहे.

“देशावर २६/११ नंतरही अनेक दहशतवादी हल्ले झाले. मात्र, आधीचे सरकार धोरणे बदलत नव्हते तर फक्त गृहमंत्री बदलत होते”, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी यावेळी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या देशात आज स्वत:ला मोठे समजणारे नेते जी भाषा वापरत आहेत त्यामुळे आपल्या शत्रू राष्ट्राला फायदा होत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायू दलाने जे शौर्य गाजवले आहे तसे गेली अनेक वर्षे झाले नाही. आपल्या जवानांनी दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार! – उपमुख्यमंत्री 

Aprna

दै. सामनाच्या पहिल्या पानावर मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात; भाजपच्या नेत्याचा टोला

Aprna