HW News Marathi
राजकारण

चार वर्षात राममंदीर का नाही बांधले ?

मुंबई | चार वर्ष सत्तेत आहात मग कोणी थांबवलं होतं कायदा करायला आणि राममंदीर बनवायला. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपवण्याचा विचार करत नाही तर तो विषय तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करता येईल. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार हेमंत टकले यांनी मिडियाशी बोलताना केला.

शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला त्या मेळाव्यात अयोध्येत राममंदीर बनवण्याचा मुद्दा सेनेने उपस्थित केला. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार हेमंत टकले यांनी जोरदार टिका केली आहे. लोकसभा निवडणूका जवळ आल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख रोज एक नवीन भाषण देत असतात त्यात एखादा नवीन विषय आणला जातो की, त्यामध्ये ना देशाचे ना राज्याचे हित असते. भाजप शिवसेनेचा मित्रपक्ष आहे परतुं शिवसेना आपले विचार असे मांडते की मित्रपक्ष नाही, तर शत्रूपक्ष आहे आणि सत्ता सोडत नाही. आणि म्हणून ते आमचं काम आहे की सत्तेत राहून त्यांच्यावर दबाव टाकण्याचे असे सांगत असतात. अरे हे कसलं राजकारण असा संतप्त सवालही आमदार हेमंत टकले यांनी यावेळी उपस्थित केला.

शिवसेना आपली शक्ती सांभाळण्यासाठी प्रत्येकवेळी काही ना काही प्रयत्न करत असते तसाच प्रयत्न स्वबळावर लढण्याचा त्यांचा आहे. परंतु शिवसेनेचे नेते, आमदार, खासदार यांना माहित आहे की, भाजपसोबत नाही गेलो तर आपला पराभव होणार आहे. ही वास्तवता आहे हे त्यांना माहित आहे परंतु शिवसैनिक बिथरु नये म्हणून त्यांच्यामध्ये हिंमत वाढवण्यासाठी कोणती ना कोणती घोषणा करणे जास्त गरजेचे असते. परंतु दसऱ्याला शिवसेना पक्षप्रमुखांचे शिवाजी पार्कामध्ये झालेल्या भाषणामध्ये दम नव्हता. ही एकप्रकारची अपॉलॉजी होती म्हणजे आम्ही काही करत नाहीय आणि काही करु शकत नाही आणि म्हणून अयोध्दा जाण्याचा संकल्प जाहीर केला असा टोला आमदार हेमंत टकले यांनी लगावला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेसाठी दराडेंना निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…नाशिक मतदारसंघाबाबत

News Desk

#MaharashtraElections2019 | जालन्यात मतदानावेळी सरपंच, उपसरपंचात मोठी हाणामारी

News Desk