HW News Marathi
राजकारण

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागा !

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप शिवसेना यांची युती होवो अथवा न होवो मात्र आपल्या बळावर भाजपच्या साथीने दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रचार कामाला लागावे, असे आठवले यांनी म्ह्टले आहे.

चेंबूर मैत्रीपार्क येथे रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राज्यसभेत जीव रमत नाही नसल्याने लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेत असल्याचे रामदास आठवले म्हणाले आहेत. ‘शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकसभा निवडणुकीत त्यांची निश्चित युती होईल असा मला विश्वास आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

‘माझ्या रिपब्लिकन पक्षाने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यामुळे शिवसेना माझ्यासाठी जरूर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडेल,’ असा विश्वास असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रिपाइं कार्यालयाच्या उदघाटनावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात लावलेल्या हजेरीमुळे या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षातर्फे दलित-मुस्लिम एकजुटीचे सूत्र राबविण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर

News Desk

कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

News Desk

पश्चिम बंगाल सरकारने हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने राहुल गांधींची सभा रद्द

News Desk