HW News Marathi
राजकारण

योगी आदित्यनाथ आज पालघरमध्ये

पालघर | दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुक येत्या २८ मे रोजी होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व पणाला लावल्याचे पहायला मिळत. विषेश म्हणजे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पालघरमध्ये या पोटनिवडणुकीला विषेश रंगत आली आहे. त्यातच कॉंग्रेसचे राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे पालघर पोटनिवडणुकीत तगडी चुरस पहायला मिळणार आहे.

शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना या लोकसभा पोटनिवडणुत सीट दिल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या अनेक वरीष्ठ नेत्यांनी वनगांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. तसेच भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावितांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी बुधवारी पालघर मध्ये उपस्थित रहाणार आहेत. बुधवारी सायंकाळी विरार पुर्व येथे सभा घेऊन ते मतदार आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. सभेनंतर लगेचच योगी आदित्यनाथ दिल्लीला जायला निघणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदींना मी झोपू देणार नाही !

News Desk

#LokSabhaElections2019 : अखेर हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

स्वाभिमानीची ३ जागांची मागणी पूर्ण करण्यासाठी शरद पवारांचे विशेष प्रयत्न

News Desk
मुंबई

मुंबईत वरुणराजाची हजेरी

News Desk

मुंबई | गरमीने हैरान झालेल्या मुंबईकरांना बुधवारी काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबईत दादर, प्रभादेवी, परळसह गिरणगावात अन्य काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. गेलया दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण मुंबईत पहायला मिळत होते त्यातच उकाडा अधिक वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने त्रस्त होते. बुधवारी वरुण राज्याने लावलेल्या हजरेमुळे मुंबईकर काही प्रमाणात नक्कीच आनंदी झालेले आहेत.

पावसाच्या अगदी हलक्या सरी बरसल्या असल्या तरीही सकाळपासूनच सर्वत्र वातावर ढगाळ आहे. घरासमोर, रस्त्यावर पाणी शिंपडावे अशा स्वरुपाचा हा पाऊस असला तरी मुंबईकर मात्र नक्कीच सुखावलेले पहायला मिळत आहेत.

Related posts

लोकल ट्रेनमधून ६ वर्षात तब्बल ६० हजार मोबाइल लंपास

News Desk

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk

ममता बॅनर्जींची ‘ही’ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna