HW News Marathi
क्रीडा

सईचे ‘कोल्हापुरी मावळे’

मुंबई | बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांनी विविध खेळांच्या टीम विकत घेतल्याचे आपल्याला वारंवार पाहायला मिळत असते. परंतु आता मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीने एखाद्या खेळातील खेळाडूंची टीम विकत घेण्याचा शुभारंभ केला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर हिने ‘महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या कुस्ती लीगमधील ‘कोल्हापुरी मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. सईचे हे ‘कोल्हापुरी मावळे’ या कुस्ती लीगमध्ये कशी खेळी करणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे यासाठी कायमच प्रयत्न

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील अशी पहिली अभिनेत्री आहे जिने खेळाडूंची टीम विकत घेतली आहे. सई म्हणते की, “ह्या कुस्ती लीगमध्ये असलेल्या टीमच्या मालकांमध्ये सध्या मी एकमेव महिला आहे. टीम मालक असल्याचा मला अभिमान आहे. आपल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे, यासाठी माझा कायमच प्रयत्न असेल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सचिन तेंडुलकरने केली धोनीची पाठराखण

swarit

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताचा १८ धावांनी पराभव

News Desk

मणिपूरमधील शेतकऱ्याच्या मुलाने पटकावले पहिले सुवर्णपदक

Gauri Tilekar
महाराष्ट्र

कापूस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

News Desk

संग्रामपूर | कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवून धरला. यावेळी सरकार विरोधी देखील देण्यात आल्या.

सोयाबीन आणि कापुस हमी भाव जाहीर करून शेतकऱयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. ऑनलाईनच्या गोंधळामुळे गतवर्षी जे शेतकरी पीकविमा भरण्या पासून वंचित राहले. त्यांना ५० टक्के पिकविम्याची रक्कम देण्यात यावी. अश्या मागण्या घेऊन स्वाभिमानी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वरवट बकाल या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून घोषणा देत वाहने अडविण्यात आली. रस्त्यावर टायर जाळून हे आंदोलन करण्यात आले.

Related posts

कर्जमाफीसाठी आता जिवंत शेतकऱ्यांचे श्राद्ध

News Desk

…त्यांचे तिकीटाचे पैसे द्या’, रोहित पवारांचा घरचा आहेर

News Desk

आमदारांचे पीए आणि ड्रायव्हर्सच्या पगारात वाढ!; अजित पवारांची घोषणा

Aprna