HW News Marathi
क्रीडा

विराटसमोर बीसीसीआयने मानली हार

मुंबई| भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंनी आपल्या पत्नीला आपल्यासोबत फक्त दोन आठवडे नेण्यास भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने परवानगी दिली होती. परंतु बीसीसीआयच्या या निर्णयावर कर्णधार विराट कोहली याने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. विराटने संपूर्ण मालिकेत पत्नीला सोबत नेण्याची विनंती केली होती.

तेव्हा विराटच्या या हट्टासमोर बीसीसीआयने हार मनाली आहे. अनेक चर्चेनंतर सल्लागार समितीने विराटची मागणी मान्य केली आहे. मात्र कोणत्याही परदेश दौऱ्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर खेळाडूंना आपापल्या पत्नींना दौऱ्यावर बोलावता येईल,अशी अट त्यांनी घातली आहे. पत्नीसोबत असल्याने संघातील वातावरण सकारत्मक राहते. त्यामुळे विराटने पंधरा दिवसाआधी बीसीसीआयकडे संपूर्ण मालिकेत पत्नींना सोबत नेण्याची विनंती केली होती. त्याला प्रशासकीय समितीने मान्यता दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk

कठुआ सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरण : पठाणकोट न्यायालयाने ७ पैकी ६ आरोपींना ठरविले दोषी

News Desk

‘सीएम चषका’ला युवकांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद, १४ लाख लोकांचा सहभाग

News Desk