HW News Marathi
क्रीडा

‘आशिया चषक २०१८’वर भारताने कोरले आपले नाव

मुंबई । ‘आशिया चषक २०१८’च्या अंतिम फेरीत अतुल्य अशी कामगिरी करत भारतीय क्रिकेट संघाने सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली अत्यंत दमदार अशी कामगिरी करत भारताने ‘आशिया चषक २०१८’ पटकावले आहे. आणखी एक विशेष म्हणजे रोहित शर्मा हा आशिया चषक पटकावणारा तिसरा मुंबईकर कर्णधार ठरला आहे.

आशिया चषकामध्ये भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला दोन वेळा पराभूत केले आहे. या चषकात अफगाणिस्तानसोबतची बरोबरी सोडता भारतीय संघ बाकी एकाही सामन्यात अपयशी ठरलेला नाही.

भारताने १९८४ साली सर्वप्रथम आशिया चषक पटकावला होता. त्यावेळी सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. १९८४ साली आशिया चषकाचे जेतेपद पटकावले होते, तर श्रीलंकेने उपविजेतेपद पटकावले होते. त्यानंतर दुसऱ्या वेळेस कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारताला आशिया चषकाचे जेतेपद पटकावून दिले होते.आतापर्यंत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सात वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईकर कर्णधार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

२० वर्षांनी फ्रान्सचे दुसरे जगज्जेतेपद, क्रोएशियावर फ्रान्सची ४-२ ने मात

News Desk

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराला सुरुवात

News Desk

भारतीय संघाने धोनीला वगळले

News Desk
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

२०१९मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू, डब्ल्यूपीसीआयचा रिपोर्ट

News Desk

कुलभूषण जाधव यांना वकिल देण्यास लाहोरच्या बार कौन्सिलचा नकार

News Desk