ऍडलेड | भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या मालिकेत पाचव्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत १-०ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या मालिकेत ३१ धावांनी विजय मिळवला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला होता. अखेर सामन्यात विक्रमी षटके टाकणाऱ्या अश्विनने जॉस हेजलवूडला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
THAT IS IT! #TeamIndia has done it! Another glorious chapter added to our love affair with Adelaide. Got close in the end, but India win by 31 runs and lead the series 1-0 #AUSvIND pic.twitter.com/hmW1Lla2q8
— BCCI (@BCCI) December 10, 2018
अखेर स्टार्कला बाद करत शमीने दिलासा दिला. त्यानंतर कमिन्सने आणि लायनने आठव्या विकेटसाठी भागिदारी रचण्याचा प्रयत्न सुरु केला. हा प्रयत्न कमिन्सला बाद करत बुमराहने हाणून पाडला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ३१ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर लयानने चिवट फलंदाजी करत भारताला अखेरची विकेट मिळवण्यासाठी घाम गाळायला लावला. अखेर अश्विनने हजेलवूडला १३ धावांवर बाद करत या शंकेचे निरसन कले.
भारताकडून शमी, बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी ३ बळी मिळवले. तर इशांतने १ बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाज लायन (३८), कमिन्स (२८), स्टार्क(२८) आणि लायनने (१३) यांनी २९१ धावांमधील १५० धावा करत भारताला चांगलाच घाम फोडला.