HW News Marathi
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने एकूण तीन सुवर्ण पदके पटकावली आहेत. भारताच्या १६ वर्षाच्या नेमबाज सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टर नेमबाजीत भारतासाठी तिसरे सुवर्ण पदक पटकावले आहे. तर दुसरीकडे नेमबाज अभिषेक वर्मानेही कांस्यपदक पटकावले आहे. सौरभने विक्रमी कामगिरी करत २४०-७ गुण मिळवले तर अभिषेकने २०१९-३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये ६५ किलो फ्रीस्टाईल प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीने जकार्ता एशियाडमध्ये सुवर्ण पदक पटकावून भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. विनेश फोगट ही एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. नेमबाज दीपक आणि लक्ष्य यांनी भारताला दोन रौप्य पदके पटकावून दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराला सुरुवात

News Desk

मी स्पॉट फिक्सिंग केलीच नाही !

News Desk

बेल्जियमने जर्मनीवर २-१ मात करत उपांत्य फेरीत दिली धडक

News Desk
महाराष्ट्र

माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद

swarit

पुणे | आज पहाटे माळशेज घाटात दरड कोसळली असून ही दरड हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने या अपघातात कोणातीही जीवितहानी झालेली नाही. परंतु सुरक्षितता म्हणून येथील वाहतूक दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. सध्या घाटात मोठ्या प्रमाणावर धुके असून वातावरणाचा अंदाज घेऊनच दरड हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

ही दरड कोसळल्यानं एका ट्रकचा संपूर्ण चुराडा झाला आहे. ट्रक ड्रायव्हर अमोल दहिफळे हा जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी काही जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts

नवाब मलिक यांची मंत्री मंडळातून हकलापट्टी करा; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Aprna

सगळे खापर केंद्र सरकारवर फोडायचे आणि स्वतः मात्र काही करायचे नाही!, भारती पवारांचे महाविकासआघाडीवर टीकास्त्र

Aprna

‘देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं’, भाजपचा घणाघात..!

News Desk