HW News Marathi
क्रीडा

अजिंक्य रहाणेचा अपमान, बीसीसीआयच्या फोटोमुळे नव्या वादाला तोंड

लंडन | भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या कसोटी सामने सुरू आहेत. या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट टीमने मंगळवारी (७ ऑगस्ट) लंडनमधील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी पूर्ण टीमचा फोटो काढण्यात आला. हा फोटो बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. बीसीसीआयच्या हा फोटो पोस्ट केल्यानंतर ट्विटरवर नाराजी व्यक्त केली.

बीसीसीआयने पोस्ट केलेला फोटोमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीसोबत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत दिसत आहे. कारण कर्णधाराबोसत टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे उभा असायला हवा होता. परंतु अजिंक्य राहणे हा मागच्या रांगेत उभा आहे. या फोटोत भारतीय क्रिकेट टीममधील एकाही क्रिकेटरची पत्नी येथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या फोटोवर नेटकरी नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय क्रिकेट टीम एखाद्या दौऱ्यावर गेली तर पहिल्या दोन आठवड्यात खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेन्ड त्यांच्यासोबत जाऊ शकत नाहीत. आणि दोन आठवड्यानंतर केवळ १४ दिवसांसाठीच त्यांच्या पत्नी क्रिकेटरांसोबत राहू शकतात. असा नियम जारी करण्यात आला होता. परंतु अनेक क्रिकेटरांच्या पत्नी सध्या लंडनमध्येच आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

News Desk

मुंब्रा येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत लखनऊ चा संघ विजेता

swarit

Asia Cup 2018 | हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर

swarit
देश / विदेश

मरीना बीचवरील अंत्यसंस्काराचा नेमका वाद काय ?

swarit

चेन्नई | तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार होणार आहे. असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. दक्षिण भारताच्या राजकारणातील पितामह म्हणून ओळखले जाणारे एम. करुणानिधी यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तामिळनाडूमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे.

अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद

द्रविड मुनेत्र कडगम पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर कुठे अंत्यसंस्कार होणार यावरून वाद सुरू झाला. सीआरझेडच्या नियमानुसार मरीना बीचवर अंत्यसंस्कार होऊ शकत नाही. यानंतर द्रमुकच्या समर्थकांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. द्रमुकने दाखल केलेल्या याचिके विरोध करताना प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला गेला.

यानुसार करुणानिधी हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकत नाही. पार्थिवावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्याचा येणार होता. परंतु मद्रास उच्च न्यायालयात आज (बुधवारी )सकाळी या याचिकेवर सुनावणी झाली.करुणानिधी मुख्यमंत्री असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री जी. रामचंद्रान असल्याने त्यांच्या पार्थिवावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार होऊ शकत नाही, असे त्यावेळेचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी म्हटले होते. न्यायालयात असा युक्तीवाद झाला असून तो न्यायालयाने मान्य देखील केला.

मरिना बीचवरील स्मारक

माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर देखील मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आला होता. या दोघांच्या अंत्यसंस्कारानंतर या बीचवर त्यांचे स्मारक देखील उभारले आहे. हे दोन्ही नेते करूणानिधी यांचे कट्टर विरोधक होते.

Related posts

प्रियकराने प्रेयसीला बाथरूममध्ये जिवंत जाळले.

News Desk

प्रादेशिक भाषेतून न्यायालयाचे निकाल मिळावेत: राष्ट्रपती

News Desk

३० डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांबद्दल जर कोणताही तोडगा निघाला नाही तर… शरद पवारांचा इशारा

News Desk