HW News Marathi
क्रीडा

अर्जुन पुरस्कार विजेत्यावर आईस्क्रीम विकण्याची वेळ

हरियाणा | अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय बॉक्सर दिनेश कुमार यांच्यावर आता आपल्या उदरनिर्वाहासाठी त्याचप्रमाणे कर्जाची परतफेड करण्यासाठी आईस्क्रीम विकण्याची वेळ आली आहे. दिनेश कुमार यांनी देशाला एकूण १७ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदक जिंकून दिली आहेत. आज मात्र त्यांना सरकारच्या मदतीची वाट पाहावी लागत आहे.

https://twitter.com/ANI/status/1056582298257317888

“मी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळावे यासाठी माझ्या वडिलांनी कर्ज काढले होते. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मी त्यांच्यासोबत आईस्क्रीम विक्रीचे काम करतो. आत्ताच्या आणि पूर्वीच्या अशा दोन्हीपैकी कोणत्याही सरकारने मला मदत केली नाही. मी सरकारला मदत आणि मला स्थिर नोकरी देण्याची विनंती करतो”, असे दिनेश कुमार यांनी म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी एका अपघातामुळे दिनेशच्या उपचारांसाठी त्याचप्रमाणे त्यांच्या सरावासाठीदेखील त्यांच्या वडिलांनी कर्ज घेतले होते. या अपघातामुळे दिनेश बॉक्सिंग खेळू शकत नाही. दिनेशने सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मात्र, विद्यमान आणि पूर्वीच्या अशा दोन्हीही सरकारकडून त्याला कोणतीही मदत देण्यात आली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारत-वेस्ट इंडिज सामन्यामध्ये भारताचा विजय

News Desk

भारतीय तरूणींने लंडनमध्ये नग्न सायकल स्पर्धेत सहभागी

News Desk

कोहलीचा नवा विक्रम, सचिनला टाकले मागे

News Desk
महाराष्ट्र

टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देणारः सुभाष देसाई

swarit

मुंबईः टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले.

मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या वाहनांची समस्यादेखील सर्वांना भेडसावत आहे. कालबाह्य वाहने नष्ट करून किंवा त्या वाहनांचा पुन्हा वापर करण्यासाठी फ्रान्सची इंदिरा कंपनी कार्यरत आहे. भारतात ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण संवर्धानासोबत भंगार वाहने नष्ट करण्याचे काम ही कंपनी करत आहे. जगभरात अनेक देशात कंपनी काम करते. भारतात देखील ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बे रोझेट, तांत्रिक विभाग प्रमुख आँलिवर ग्वाझु, महिंद्रा सनयो स्पेशल स्टिल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उदय गुप्ता, कार्यकारी अधिकारी दिलीप पाचपांडे, सल्लागार सतीश घोरगे, नाथ इक्जिमचे संचालक विरंजन नाथ आदी उपस्थित होते. दरम्यान, पुनर्वापर आणि प्रक्रिया हे भविष्याची गरज असून उद्योग मंत्रालय अशा कंपन्यांना कायम पाठिंबा देईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार विशेष धोरण तयार करेल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.

Related posts

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला, शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

महाराष्ट्रावर तौक्ते चक्रीवादळाचं संकट, मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा

News Desk

“तुम्हा सगळ्यांना मीच पुरुन उरेल…”, चित्रा वाघ भडकल्या

News Desk