HW News Marathi
क्रीडा

आजपासून महिला हॉकी वर्ल्डकपला सुरुवात

लंडन । महिलांच्या हॉकी वर्ल्डकपला आज, शनिवारपासून सुरुवात होते आहे. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या संघांनाच जेतेपदासाठी फेव्हरिट मानले जात आहे. विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत तब्बल ५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या राणी रामपालच्या भारतीय महिला हॉकी संघाची खरी कसोटी लागणार आहे. २०१० साली झालेल्या स्पर्धेत शेवटी खेळला होता. त्या संघातील राणी रामपाल आणि सविता या दोघींचा अपवाद वगळता. यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील इतर सर्वच खेळाडूंची ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे.

सध्या जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जरी पोहचला तरी ती भारतासाठी मोठी कामगिरी ठरू शकते. भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी १९७४ च्या स्पर्धेत झाली होती. त्यावेळी भारताने चौथा क्रमांक मिळवला होता. पण त्यानंतर मात्र आतापर्यंत भारताची मजल त्याच्या पुढे कधीच गेली नाही.

२०१० च्या शेवटच्या स्पर्धेत भारतीय संघ ९ व्या क्रमांकावर होता. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने चौथा क्रमांक मिळवला होता. त्यांनी सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला चांगली झुंज दिली होती. बलाढ्य इंग्लंड संघाला गटातील लढतीत भारताने नमवले होते. पण कास्यपदकाच्या लढतीत मात्र इंग्लंडकडून भारतीय संघ पराभूत झाला होता. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सरावाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ती स्पर्धा फायदेशीर ठरेल. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने चांगली तयारी केली असून, स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू असे कर्णधार राणी रामपालने सांगितले. या स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया जर्मनी आणि हाँलंड या ३ संघाचे वर्चस्व राहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारतीय तरूणींने लंडनमध्ये नग्न सायकल स्पर्धेत सहभागी

News Desk

आंतरराष्ट्रीय धावपटू परविंदर चौधरीची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

भारतीय हॉकी संघाचा जादुई खेळाडू ध्यानचंद

News Desk
महाराष्ट्र

सॅनिटरी नॅपकिनवर आता जीएसटी नाही

News Desk

नवी दिल्ली। सॅनिटरी नॅपकिनवर आता जीएसटी लागणार नाही. महाराष्ट्र सरकारची मागणी जीएसटी काऊन्सिलकडून मान्य करण्यात आली आहे. आज जीएसटी काऊन्सिलची २८ वी बैठक अर्थमंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी कर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जीएसटीकडून सॅनिटरी नॅपकिन वगळण्यात यावा, यासाठी देशभरातून आंदोलन केले जात होते.

या बैठकीत जीएसटी रिटर्न नियमही शिथील करण्यात आले आहेत. २८ टक्क्यांच्या श्रेणीतील एकूण ३५ पेक्षा अधिक उत्पादनांवरील जीएसटी करात कपात करण्यात आली आहे. जीएसटी रिटर्न भरणार्‍यांना आता फक्त एक पानाचा अर्ज भरावा लागेल. त्यामुळे महिन्यातून तीनवेळा रिटर्न अर्ज भरण्याचा त्रास वाचणार आहे.

पाच कोटी रुपयांपर्यंत टर्नओव्हर असलेल्या व्यापार्‍यांना तिमाही रिटर्न भरावा लागणार आहे. जीएसटी कपात करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये बॅटरीवरील गाडी, वॉटर कुलर, आईस्क्रीम आदी उपकरणाचा समावेश आहे. मार्बल स्टोनच्या देवीदेवतांच्या मूर्तीही स्वस्त होणार आहे. तसेच डिझाईन केलेल्या वस्तूंवरील जीएसटी १८ वरून १२ टक्क्यांवर आणला आहे.

Related posts

नागपूर येथील ‘वनभवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान

Aprna

मी आणि फडणवीस यापुढेही भेटत राहणार!

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण अनुयायांसाठी केले जाणार – धनंजय मुंडे

News Desk