HW News Marathi
क्रीडा

मेरी कोमची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

नवी दिल्ली | महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची महिला बॉक्सर मेरी कोमने प्रवेश केला आहे. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या किम ह्यांग मीचा ५-० ने पराभव केला. या कामगिरीसह मेरी कोम एक अनोखा विक्रम करणार आहे.

३५ वर्षीय मेरी कोम यांच्या नावावर महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची प्रत्येकी ५ सुवर्णपदकं जमा आहेत. मेरी कोमने २००२, २००५, २००६, २००८ आणि २०१० च्या चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. जर आताच्या अंतिम सामन्यात मेरीने विजेतेपद पटकावले तर हा तिचा ऐतिहासिक विजय असेल. या आधी पाच वेळा सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम आर्यलंडच्या केटी टेलरच्या नावावर आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

News Desk

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना आज रंगणार

News Desk

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ | भारताला आणखी एक सुवर्णभेट

News Desk
राजकारण

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लेखी आश्वसनाचे गाजर ?

News Desk

मुंबई | शेतकरी आणि आदिवासींनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ काढण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांनी लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांना सरकारने आश्वासन दिले आहे. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने मोर्चेकऱ्यांना दिले आहे.

आदिवासी जमिनीच्या पट्टेधारकांना सर्व दुष्काळी सवलत देण्यात येणार आहेत. तर शेतीसाठी खावटी अनुदान देण्याबाबतही निर्णय झाला असल्याची माहिती सरकारने दिली आहे. गैरआदिवासी आणि आदिवासींना तीन पिढीची राहिवासीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. याबाबत राज्य केंद्राला शिफारस करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. वन्य जमीन पट्ट्याच्या प्रकरणातील ८० टक्के दावे सरकारने फेटाळले होते.

 

Related posts

“चुना लगाव आयोग… “, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

Aprna

पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही !

News Desk

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम! – मुख्यमंत्री

Aprna