HW News Marathi
क्रीडा

भारतीय महिला संघाचे टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित

मुंबई | भारतीय महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत आयर्लंड संघावर ५२ धावांनी मात करुन उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. मिताली राजच्या अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला संघाने हा विजय मिळवला. या आधीच्या दोन लढतींत भारताने न्यूझीलंड आणि पाकिस्तानवर मात केली होती. दरम्यान, भारताचा साखळीतील शेवटचा सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी १० षटकांत ६७ धावांची सलामी दिली. स्मृतीने २९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ३३ धावा केल्या. स्मृतीने मागील दोन लढतींत २६ आणि २ धावा केल्या होत्या. यानंतर इतर फलंदाजांकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, जेमिमा रॉड्रिगेज तीन चौकार मारून माघारी परतली. हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. वेदा कृष्णमूर्तीने पुन्हा एकदा निराशा केली. डी. हेमलताही चार धावांवर धावबाद झाली. मिताली राजने एकाबाजूने किल्ला लढविला. तिने ५६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ५१ धावा केल्या. मितालीचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-२०मधील हे तिचे १७वे अर्धशतक ठरले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या महिलांना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेण्यात अपयश आले. लेविस ९ धावांवर बाद झाल्यानंतर शिलिंग्टन आणि जॉयसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा; पण ही जोडी फुटली आणि आयर्लंडच्या फलंदाजांनी भारतीय महिलांसमोर शरणागती पत्करली. भारताने दिलेल्या १४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला ८ बाद ९३ धावाच करता आल्या. भारताकडून राधा यादवने तीन विकेट घेतल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रविंद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार तर दीपा मलिक, बजरंग पुनिया यांना ‘खेलरत्न’

News Desk

भालाफेकीत २० वर्षीय नीरज चोप्राने पटकावले सुवर्णपदक

News Desk

विराट कोहलीचा मोठा निर्णय, कर्णधारपद सोडणार!

News Desk
राजकारण

छिंदमच्या विजयाला आव्हान देणारी याचिका दाखल

News Desk

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून संपूर्ण राज्याचा रोष ओढवून घेणाऱ्या श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ९ मधून २००० पेक्षा जास्त मतांसह विजयी झाला. परंतु, याबाबत आता आक्षेप घेण्यात आला आहे. छिंदमच्या विजयालाच आव्हान देणारी याचिका निलेश म्हसे यांनी याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. निलेश म्हसे हे या निवडणुकीत छिंदमच्या विरोधात उभे राहिले होते. छिंदमची झालेली निवड रद्द ठरवावी, अशी मागणी देखील या याचिकेमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेमुळे छिंदमच्या अडचणीत वाढ होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत छिंदमने अपशब्द काढल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर संतप्त टीका झाली होती. त्यामुळेच छिंदमला भाजपमधून बाहेरची वाट दाखविण्यात आली होती. त्यानंतर त्याने अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. धक्कादायक म्हणजे छिंदमवर यावेळी गुन्हा दाखल असून तो तडीपार होता तरीही, या निवडणुकीत जनमत छिंदमच्याच बाजूनेच झुकले. मात्र, आता छिंदमच्या विजयला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आल्याने छिंदमच्या अडचणीत वाढ झाली आहे. महापलिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

Related posts

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

Aprna

गंभीरने मुख्यमंत्री केजरीवालांसह ३ जणांवर ठोकला मानहानीचा दावा

News Desk

मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?

News Desk