HW News Marathi
क्रीडा

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत जालन्याच्या किशोरची बाजी!

जालना : जागतिक पोलीस स्पर्धेत किशोर डांगे या जालन्याच्या शरीर सौष्ठवपटूने रौप्यपदक पटकाविले आहे. लॉस एंजिल्स येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत जालना पोलीस दलात कार्यरत असणा-या डांगे याने ३४ वर्षांखालील १०० किलो वजनी गटात हे पदक जिंकले. याच स्पर्धेत मलेशियाच्या खेळाडूने सुवर्ण, तर अमेरिकेने कास्यपदक पटकावले.

किशोर याचे जागतिक पोलीस स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. या आधी त्याने २१३ मध्ये सुवर्ण पदक पटकाविले होते. दुबई क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने रौप्य, तर सौदीमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. महाराष्ट्र श्री, मराठवाडा श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विविध पदके जिंकली आहेत.

जागतिक पोलीस स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर त्याचे शनिवारी जालन्यात आगमन झाले. तपोवन एक्स्प्रेसने जालना स्थानकावर उतरताच फेटा बांधून किशोरची फूल व तिरंगी झेंड्यांनी सजविलेल्या लाल रंगाच्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी सात वाजता किशोरच्या कन्हैयानगरातील घराजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा

News Desk

मेरी कोमचा ऐतिहासिक विजय, सहाव्यांदा मिळवले सुवर्णपदक

News Desk

चौथ्यांदा विजेतेपद भूषविणाऱ्या मुंबई इंडियन्सची आज मिरवणूक

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

सेल्फी घेणा-या युवकाला हत्तींनी चिरडले

News Desk

दिल्लीत शेतकरी आक्रमक, पोलिसांचा लाठीचार्ज

News Desk

तिथे दिल्लीत ठाकरे-मोदी भेट झाली, आणि इथे देसाईंनी स्वबळाची घोषणा केली

News Desk