HW News Marathi
क्रीडा

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत जालन्याच्या किशोरची बाजी!

जालना : जागतिक पोलीस स्पर्धेत किशोर डांगे या जालन्याच्या शरीर सौष्ठवपटूने रौप्यपदक पटकाविले आहे. लॉस एंजिल्स येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत जालना पोलीस दलात कार्यरत असणा-या डांगे याने ३४ वर्षांखालील १०० किलो वजनी गटात हे पदक जिंकले. याच स्पर्धेत मलेशियाच्या खेळाडूने सुवर्ण, तर अमेरिकेने कास्यपदक पटकावले.

किशोर याचे जागतिक पोलीस स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. या आधी त्याने २१३ मध्ये सुवर्ण पदक पटकाविले होते. दुबई क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने रौप्य, तर सौदीमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. महाराष्ट्र श्री, मराठवाडा श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विविध पदके जिंकली आहेत.

जागतिक पोलीस स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर त्याचे शनिवारी जालन्यात आगमन झाले. तपोवन एक्स्प्रेसने जालना स्थानकावर उतरताच फेटा बांधून किशोरची फूल व तिरंगी झेंड्यांनी सजविलेल्या लाल रंगाच्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी सात वाजता किशोरच्या कन्हैयानगरातील घराजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘संपर्क फॉर समर्थन’च्या अंतर्गत अमित शहांनी घेतली धोनीची भेट

News Desk

आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

News Desk

बीसीसीायकडून अभिनंदनच्या नावाची जर्सी लॉन्ज करून अनोखी सलामी

News Desk
राजकारण

संयुक्त पत्रकार परिषदेत मी आणि उध्दव ठाकरे जे बोललो तेच अंतिम !

News Desk

मुंबई । “अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या अटीवरच शिवसेना-भाजपची युती झाली असून भाजपने ही अट अमान्य केल्यास युती तोडू”, असे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी काहीच दिवसांपूर्वी केले होते. मात्र “कोणकोणते मुद्दे, अटी विचारात घेऊन भाजप-शिवसेनेची युती झाली याबाबत मी आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत जे बोललो तेच अंतिम समजा”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (२३ फेब्रुवारी) स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे त्या संयुक्त पत्रकार परिषदेत केवळ जागावाटपाविषयी माहिती देण्यात आली होती. मात्र, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. “त्या पत्रकार परिषदेत आम्ही जे बोललो तेच अंतिम समजा”, या मुख्यमंत्र्यांच्या विधान म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाणार नसल्याचे संकेत आहेत का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

Related posts

शरद पवार नौ दो ग्यारह हो गये, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

News Desk

राज ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का | राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांचा राजीनामा

News Desk

राष्ट्रीय महिला आयोगाने राहुल गांधींना बजावली नोटीस

News Desk