HW News Marathi
Uncategorized

भारत-पाक सामना होता फिक्स !

वृत्तसंस्था- भारत-पाकदरम्यान झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. हा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागला असून या सामन्याची चौकशी करण्याची मागणी होत असल्याची माहीती आठवले यांनी दिली आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या भारतीय संघाच्या पराभवाची चौकशी करणे गरजेचे असल्याचे म्हणलंय. ते शुक्रवारी गुजरातमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी १८ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्याची चौकशी करण्याची मागणी केली.

चॅम्पियन्स करंडकातील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला सहजपणे हरवले होते. मग अंतिम सामन्यात भारताचा इतका ताकदवान संघ कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून पराभूत कसा काय होऊ शकतो, असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला. त्यामुळे या सगळ्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे आठवले यांनी सांगितले. आठवलेंआधी पाकिस्तानी खेळाडू आमिर सोहलनेही पाकिस्तानचा संघ फिक्सिंग करून अंतिम फेरीत पोहोचल्याची टीका केली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा करत सोहेलने सामन्याआधी मोठी खळबळ उडवून दिली होती.

चॅम्पियन्स करंडकाच्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यातही भारत पाकिस्तानवर मात करेली अशी सर्वांना आशा होती. मात्र पाकिस्तानने भारताला धक्का देत चॅम्पियन्स करंडक आपल्या नावे केला होता. या पराभवानंतर भारतीय चाहत्यांनी संघाच्या खेळाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी पवार आणि राष्ट्रवादीसोबतचं…मोहिते-पाटलांचे घुमजाव !

News Desk

सावत्र आई – पित्याने पाडला मुलाचा मुडदा

News Desk

ऑनलाइन सेक्स चॅटींगच्या नावाने पैसे उकळण्याचा गोरखधंदा तेजीत EXCLUSIVE

News Desk