HW News Marathi
Uncategorized

11 वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

डोंबिवलीतील गोपाळ नगरमधील एका ११ वर्षीय विद्यार्थ्यानीने गुरूवारी रात्री गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. गळफास घेण्याचा कारण म्हणजे हिंदी विषयाच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थानीने आत्महत्या केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीला हिंदी विषयातील परीक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे शिक्षिकेनं तिला फटकारले होते, ओरडल्यादेखील होत्या व मुख्याध्यापिकेकडे घेऊन गेल्या होत्या. यावेळी मुख्याध्यापिकांनी मुलीला पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते. पालकांना शाळेत बोलावल्यानं ती तणावाखाली होती. मात्र घरातल्यांना याबाबत तिनं काहीही सांगितले नाही. मात्र याच तणावाखाली तिनं आत्महत्या केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

२०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येणार!

News Desk

“मवाळपणा माझ्या रक्तात नाही” – नारायण राणे

News Desk

शुश्रुषा रुग्णालयात २ परिचारिकांना कोरोना’ची लागण, नवीन रुग्णांना दाखल करू नये, महापालिकेचे आदेश

News Desk
महाराष्ट्र

टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देणारः सुभाष देसाई

swarit

मुंबईः टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले.

मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या वाहनांची समस्यादेखील सर्वांना भेडसावत आहे. कालबाह्य वाहने नष्ट करून किंवा त्या वाहनांचा पुन्हा वापर करण्यासाठी फ्रान्सची इंदिरा कंपनी कार्यरत आहे. भारतात ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण संवर्धानासोबत भंगार वाहने नष्ट करण्याचे काम ही कंपनी करत आहे. जगभरात अनेक देशात कंपनी काम करते. भारतात देखील ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बे रोझेट, तांत्रिक विभाग प्रमुख आँलिवर ग्वाझु, महिंद्रा सनयो स्पेशल स्टिल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उदय गुप्ता, कार्यकारी अधिकारी दिलीप पाचपांडे, सल्लागार सतीश घोरगे, नाथ इक्जिमचे संचालक विरंजन नाथ आदी उपस्थित होते. दरम्यान, पुनर्वापर आणि प्रक्रिया हे भविष्याची गरज असून उद्योग मंत्रालय अशा कंपन्यांना कायम पाठिंबा देईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार विशेष धोरण तयार करेल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.

Related posts

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला, शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

महाराष्ट्रावर तौक्ते चक्रीवादळाचं संकट, मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा

News Desk

“तुम्हा सगळ्यांना मीच पुरुन उरेल…”, चित्रा वाघ भडकल्या

News Desk