HW News Marathi
Uncategorized

महाविकासआघाडी सरकारला कसलाचं धोका नाही,अजितदादांना विश्वास !

पुणे |अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला ,त्यानंतर हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ सभेतलं भाषणंआहे अशी टिका विरोधी पक्षाने केली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘कोणी काहीही म्हणो, मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, या सरकारला कोणताही धोका नाही,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं.पुणे जिल्ह्यातील मावळ मधील एका खाजगी कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

यावेळी बोलताना अजितदाद  म्हणाले की, ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणिमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही,’ असे ते म्हणाले.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘कोण काय बोलतं, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, महाविकासआघाडीचे सरकार व्यवस्थित काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही,’ असे ते म्हणाले.दरम्यान, ‘ज्यांची ऐपत आहे त्यांनी दहा रुपयांची शिवभोजन थाळी खाऊ नये”, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

त्यामुळे महाविकासआघाडीला १०० दिवस पुर्ण होण्याच्या पार्श्वभुमिवर हे सरकार ५ वर्ष टिकेल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन राऊतांनी महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचे काम करावे ! दरेकरांचा टोला

News Desk

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

राष्ट्रपती राजवट लावली तरी भाजपचं सरकार येणार नाही ,आठवलेंचा दावा !

Arati More