HW News Marathi
Uncategorized

भारताची नवी खेळी, पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तामध्ये पाठवला गहू

नवी दिल्लीः भारत-अफगाणिस्तान-इराण या देशांमधील व्यापारी संबंध वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने भारताने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. हे करताना भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे. भारतातील गहू अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना झाला आहे. इराणच्या चाबहार बंदरमार्गे हा गहू अफगाणिस्तानमध्ये दाखल होणार असून चाबहार बंदरचा भारताने पहिल्यांदाच वापर केला आहे.

चाबहार बंदरामुळे भारत- अफगाणिस्तान- इराण हे तिन्ही देश जवळ आले आहेत. रविवारी भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतातील गहू अफगाणिस्तानला रवाना झाला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा सोहळा पार पडला. भारतातील ११ लाख टन गहू अफगाणिस्तानला रवाना झाला आहे. भारत- अफगाणिस्तानमधील व्यापार हा पाकिस्तानमार्गे होत होता. मात्र आता इराणमधील चाबहार बंदरमार्गे गहू अफगाणिस्तानात पाठवण्यात येणार आहे. यापुढे भारताला पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि इराणशी संपर्क साधणे सहज शक्य होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल व एन विभागातील नागरीकांनी पाणी उकळून प्यावे- पालिका

News Desk

जाणून घ्या… एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी करण्यामागचे खरे कारण

Aprna

सुकमा नक्षलवादी हल्ला भ्याड; शहिद जवांनाना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रध्दांजली

swarit