HW News Marathi
Uncategorized

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५० कोटी लोकांची कोरोना चाचणी मोफत होणार

नवी दिल्ली | कोरोनाचे जाळे देशभरात घट्ट पकड करतंच आहे. या अनुशंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने कोरोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे. या संबंधीचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या २००० च्या वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ६५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनापासून देशाचा कसा बचाव करता येईल आणि लोकांना कसे याच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवता येईल याकडे लक्ष देत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे ICICI बॅंकेचे 2 एटीएम फोडले, 39 लाख लंपास

News Desk

शुश्रुषा रुग्णालयात २ परिचारिकांना कोरोना’ची लागण, नवीन रुग्णांना दाखल करू नये, महापालिकेचे आदेश

News Desk

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल!

Ruchita Chowdhary