HW News Marathi
Uncategorized

भाजपला अडचणीत वाढ, शिवसेना उतरणात गुजरातच्या रणांगणात

मुंबई: मोदी व भाजपला पाण्यात पाहणा-या शिवसेनेने आता गुजरात निवडणुकांमध्ये उतरण्याची तयारी दाखवली आहे. सर्व विरोधकांमुळे मोदी व भाजपच्या नाकी नऊ आले असताना शिवसेनेची त्यात भर टाकल्याने भाजपच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहेत. शिवसेनेने गुजरात विधानसभा निवडणुकीत ४० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मोदींच्या बालेकिल्ल्यात त्यांना आव्हान देणे कितपत योग्य ठरते, हे येता काळाच ठरवणार आहे.

शिवसेनेने आधी गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता शिवसेनेने घूमजाव करत गुजरातमध्ये निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. याशिवाय नगरसेविका राजूल पटेल आणि हेमराज शहा यांच्या नेतृत्त्वाखाली एक टीम गुजरातला रवाना होणार आहे. गुजरातमधील परिस्थिती आणि लढवण्यात येणाºया जागांचा आढावा घेण्याचे काम या टीमकडून करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून गुजरातच्या सूरत आणि राजकोटमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार केले जाणार आहेत. या भागात मराठी भाषकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत, असे राजूल पटेल यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत –  रविशंकर प्रसाद

News Desk

लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखण्याचे मोदींचे आवाहन

News Desk

ऑनलाइन सेक्स चॅटींगच्या नावाने पैसे उकळण्याचा गोरखधंदा तेजीत EXCLUSIVE

News Desk
देश / विदेश

मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे

Gauri Tilekar

नवी दिल्ली । मुलांच्या लग्नाचे वय २१ वरून १८ वर्षे करावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु या याचिकेमागे कोणताही योग्य हेतू नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. १८ वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार आहे, लष्करात भरती होण्याचा अधिकार आहे, तर २१ वर्षापर्यंत लग्नासाठी थांबण्यात काहीच मुद्दा नाही, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती.

ही याचिका दाखल करणाऱ्याला न्यायालयाकडून २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सर न्यायधीश रंजन गोगोई, जस्टीस एस.के.कौल व जस्टीस एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. ५० वर्षे वय असलेल्या याचिकाकर्त्याने लग्नाचे वय १८ करण्याची मागणी करू नये, असे मत कोर्टाने नोंदवले आहे. तसेच १८वर्षाचा मुलगा स्वतःहून येईल, तेव्हा या मागणीचा विचार करू असे ही कोर्टाने सांगितले. वकील अशोक पांडे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

Related posts

मोठी बातमी, अनिल देशमुखांवरील आरोपांत तथ्य नाही, राजीनामा होणार नाही – शरद पवार

News Desk

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ वर ! देशात सर्वाधिक कोरोनारूग्ण महाराष्ट्रात

Arati More

‘उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा’

News Desk