HW News Marathi
Uncategorized

सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले- शरद पवार

औरंगाबाद येथे हल्लाबोल यात्रेत सरकारने शेतक-यांना देशोधडीला लावल्याची टीका केली आहे. हल्लाबोल यात्रेच्या समारोपात ते बोलत होते. सरकारने शेतक-यांची वीज तोडतय पाणी देत नाही.हे सरकार शेक-यांविरोधात आहे. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

औरंगाबादमधली इंटरनेट सेवा बंद करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. आता ते आवाज दाबतायेत त्याला बटन दाबून उत्तर द्या असं आवाहन अजित पवारांनी केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा समारोप आज औरंगाबादेत झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून 16 जानेवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरवात झाली होती. नऊ दिवस ही यात्रा सुरू होती. या नऊ दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सात जिल्ह्यांमधल्या 26 तालुक्‍यातल्या जनतेशी संवाद साधला. आजच्या समारोपाच्या रॅलीला विधान परिषदेतील उपनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिंदूत्वाची व्याख्या संघाने बदलली

News Desk

अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर पीएमओकडून सकारात्मक विचार

swarit

राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एका महिन्याचे वेतन राज्य-केंद्राच्या सहाय्य्यता निधीला देणार !

News Desk
मुंबई

राज ठाकरेंनी नाकारले चांदीचे सिंहासन

swarit

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उभ्या महाराष्ट्रातील आपल्या वक्तृत्वमुळे तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. यांची प्रसिद्ध सिनेसृष्टीतील अभिनेत्याला देखील लाजवेल अशी आहे. यांच्या चहात्यांमध्ये अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचा देखील समावेश आहे. राज ठाकरे यांची सभा म्हटले की, प्रचंड संख्येने लोक गर्दी करतात. हे काही तुम्हा आम्हाला काही नवीन नाही.

आपल्या विरोधकांच्या नकला करुन खास ठाकरे शैलीत त्यांचा पाहुणचार हे कसब राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाकडून मिळाले आहे. ऐवढेच नव्हे राज ठाकरे यांना त्यांच्या काकासारखा आक्रमकपणे भाषण देणे असो वा व्यंगचित्र काढणे असो त्यांना आनुवंशिकरित्या कलागुणांचा वारसा मिळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, तिरसकपणा किंवा योग्य टायमिंग साधून विरोधकांची कोडी करण्याचे कसब यांना चांगलेच अवगत आहे.

परप्रांतीय लोढे, टोल माफी, फेरीवाले, मराठी सिनेमांना स्क्रिन देणे राज ठाकरे यांनी या सर्व मुद्दवर संपूर्ण महाराष्ट्रभर खळखट्ट्या करुन रान पेटविले. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणार नेता म्हणून यांची ख्याती आहे. या खळखट्ट्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कोर्टात अनेक खटले देखील दाखल झाले आहेत. हे मनसैनिकातच नव्हेत तर महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात, जिल्ह्यात, खेडापाड्यात सर्व सामान्य लोकांमध्ये त्यांच्या मनात प्रेम आहे.

या प्रेमा पोटी काही चाहत्यांनी राज ठाकरे यांना चांदीचे सिंहासन भेट देण्यात आले. पण, ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जावून हे सिंहासन भेट केले होते. पण, हे चांदीचे सिंहासनचा स्वीकार त्यांनी नकार दिला. पुण्याच्या मनसे कार्यकर्त्या सीमा विधाते आणि सागर विधाते या दोघांनी हे चांदीचे सिंहासन भेट केले होते. या सिंहासनाची किंमत जवळपास १८ लाख रुपये आहे. सिंहासन न स्वीकारल्यामुळे सीमा व सागर विधाते या दोघांनी नाराजचा सूर आवळला आहे. या सिंहासनावरुन चांगलेच राजकारण रंगलेले दिसत आहे.

Related posts

आयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडी

News Desk

बदलापूरमधील केमिकल कंपनीला भीषण आग

News Desk

कपाडिया नगर परिसरातील पुलाचा भाग कोसळला

swarit