HW News Marathi
Uncategorized

सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले- शरद पवार

औरंगाबाद येथे हल्लाबोल यात्रेत सरकारने शेतक-यांना देशोधडीला लावल्याची टीका केली आहे. हल्लाबोल यात्रेच्या समारोपात ते बोलत होते. सरकारने शेतक-यांची वीज तोडतय पाणी देत नाही.हे सरकार शेक-यांविरोधात आहे. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

औरंगाबादमधली इंटरनेट सेवा बंद करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. आता ते आवाज दाबतायेत त्याला बटन दाबून उत्तर द्या असं आवाहन अजित पवारांनी केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा समारोप आज औरंगाबादेत झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप सभा झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून 16 जानेवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरवात झाली होती. नऊ दिवस ही यात्रा सुरू होती. या नऊ दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सात जिल्ह्यांमधल्या 26 तालुक्‍यातल्या जनतेशी संवाद साधला. आजच्या समारोपाच्या रॅलीला विधान परिषदेतील उपनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाच्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात टक्क्यांनी वाढेल, अहवाल संसदेत सादर

News Desk

केंद्रीय सुरक्षा बलाच्या ६ जवानांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

News Desk

Budget 2019 : पेट्रोल-डिझेल लीटरमागे १ रुपयांनी महागणार

News Desk