HW News Marathi
Uncategorized

राष्ट्रपती राजवट लावली तरी भाजपचं सरकार येणार नाही ,आठवलेंचा दावा !

दिल्ली | राज्यसभा खासदार आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे . आठवले यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. याआधी भाजपच्या नेत्यांनी राणेंची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही असे स्पष्ट केले होते . मात्र आता भाजपच्या मित्रपक्षाचे नेते असलेल्या आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोरोना नियंत्रण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

रामदास आठवले म्हणाले, “महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 54 हजारहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई देखील कोरोनामय झाली आहे. या कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची होती. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे सर्वाधिक 1 हजार कोरोना मृत्यू मुंबईत झाले आहेत. अशास्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली, तरी भाजपचं सरकार येईल असं मला वाटत नाही. कारण भाजपला सत्ता स्थापनेसाठी आघाडीतील तीनपैकी एका पक्षाचा पाठिंबा लागणार आहे. तरच महायुतीचं सरकार येईल. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीमुळे महायुतीचं सरकार येईल असं नाही .”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुरीपासून डाळ बनवण्याच्या प्रक्रियेत झालेला 2500 हजार कोटी रुपयांचा घोटाळा

Adil

Sameer Wankhede यांची पत्नी Kranti Redkar चं मुख्यमंत्र्यांना पत्र, भेटण्यासाठीही केली मागणी

swarit

“ते २५ वर्षे शिवसेनेतच होते”, संजय राऊतांची राणेंवर टीका

News Desk