HW News Marathi
Uncategorized

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांची ‘आघाडी’

मुंबई | लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींला बहुमत मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. देशभरात एनडीएला दुपार पर्यंत २९२ जागांवर आघाडी आहे. तर राज्यात काही ठिकाणी युतीचे उमेदवार आघाडीवर असून मुंबईतील ६ जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना गड मानला जाणाऱ्या औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आघाडीवर आहे. दुपार पर्यंत इम्तियाज यांना ३५ हजार मते मिळाली आहे.

तसेच शिवसेना गड मानला जाणाऱ्या औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आघाडीवर असून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे मराठा समाजाला दिलेला पाठिंबा फायदेशीर ठरताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे चंद्रकांत खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे चित्र सध्या औरंगाबादमध्ये दिसून येत आहे. तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे. औरंगाबादेत तिरंगी लढत असली तरीत हर्षवर्धन, खैरे आणि जलील यांच्यात असली तरी खैरे दोघांपेक्षा मागे दिसत आहेत.

खैरे यांना यावेळी बंडखोरीचे ग्रहन लागल्याचे चित्र आहे. तर जलील यांना मुस्लीम आणि दलितांची एकगठ्ठा मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यात काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. एकूण या चुरशीच्या स्थितीमुळे औरंगाबादेत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुकमा नक्षलवादी हल्ला भ्याड; शहिद जवांनाना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रध्दांजली

swarit

जिओ देणार मोफत मोबाइल

News Desk

मराठवाड्यात 24 तासांत वर्षभराचा पाऊस

News Desk