HW News Marathi
Uncategorized

“सुशांतसिंगची आत्महत्या नव्हती तर मग हत्यारा कोण हे सीबीआयने सांगावे…”, राष्ट्रवादीची मागणी

मुंबई | सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणुक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला व ही केस सीबीआयकडे दिली होती परंतु निष्पन्न काय झालं असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.एक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ST कडून रत्नागिरी जिल्ह्यातील ८६ रोजंदारी कर्मचाऱ्याचं निलंबन

News Desk

महाविकासआघाडीच्या खातेवाटपाबाबत शरद पवार म्हणतात…!

News Desk

BJP कडून Narayan Rane यांचे ‘Mission 144’… होणार का फत्ते?

News Desk