HW News Marathi
Uncategorized

आम्हाला वाटलं मोदी चुल पेटवण्याबद्दल बोलतील, पण…

नवी दिल्ली | कोरोनाशी लढण्यासाठी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात सरकारी यंत्रणा, डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ एप्रिल) भारतीयांना संबोधित केले होते. यात त्यांनी ५ एप्रिलला रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सगळ्यांनी आपल्या घरातील लाईट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, टॉर्च लावायच्या आहेत असे आवाहन मोदींनी केले. कोरोनामूळे देशात पसरलेला अंधार दुर करण्यासाठी हे करायला हवे असे त्यांनी म्हटले. दरम्यान, त्यांच्या या आवाहनानंतर राजकीय स्तरातून मोदींवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे.

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आम्हाला वाटले मोदी चुल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील असे वाटले होते पण त्यांनी तर दिवा पेटवायला सांगितला, अशी खोचक टीका त्यांनी ट्विटरवरुन केली आहे.

मोदींच्या या घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याच्या आवाहनाला नेटकऱ्यांनींही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

औरंगाबादमध्ये ९३८ जणांना गॅस्ट्रो

News Desk

…टीका करणाऱ्यांची मने प्रदूषित!

swarit

१७ व्या लोकसभा निवडणुकीत ७८ महिला खासदार संसदेत जाणार

News Desk