HW News Marathi
Uncategorized

मतदाना दिवशी जनताच भाजपला शॉक देणार, मोदीजी काळ्या पैशाचं काय झालं ?

– राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल :

गांधीनगर गुजरातमध्ये मतदाना दिवशी भाजपला जोरदार शॉक लागेल अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. भरुच इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भरूच हे राहुल गांधींच्या अजोबांचे गाव आहे. काळ्या पैशाचा मुद्दा उपस्थित करत मोदींना राहुल यांनी घेरण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३ वर्षात किती काळा पैसा आणला त्याचं उत्तर द्या असेही ते यावेळी म्हणाले. काळा पैसा आणला असेल तर तो मग सर्व सामान्यांच्या खात्यात अजून का जमा केला नाही. तो कुठे गेला असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राहुल गांधी सध्या तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. या सभेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना लक्ष करत त्यांच्या धोरणांची खिल्ली उडवली. नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी आदी मुद्द्यावरुन त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. चीन दररोज 50 हजार युवकांना रोजगार देतो आणि भारतात फक्त 450 लोकांना रोजगार मिळतो. हा मेक इन इंडिया ठरु शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. मोदीजी एक सेल्फी घेतला की तिकडे चीनमध्ये एका तरूणाला नोकरीमध्ये अशा शब्दात त्यांनी मोदींची खिल्ली उडवली. मेक इन इंडीयाचा फज्जा उडाल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरात मॉडेल हे केवळ उद्योगपतींसाठीच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. सर्वसामान्य, गरिब, शेतकरी, मजूर गुजरातमध्ये हैराण आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितले. देशाची अर्थव्यवस्था मोदींनी नष्ठ केली. छोटे व्यापारी मोदींच्या आर्थिक धोरणामुळे नष्ठ झाले असा आरोपही त्यांनी केला. काळ्या पैशाच्या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी मोदींना घेरले. स्विस बँकेत किती काळा पैसा आहे. त्याची यादी मिळाली का…ते कोण आहेत. विजय मल्ल्या तर पळून गेला असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५ हजार गरीबांना अन्न धान्य वितरित करुन घडवला आदर्श…

swarit

ही मुले दररोज दोन तास मोबाईलवर खर्च करतात

News Desk

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk