HW News Marathi
Uncategorized

राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम: शिवसेना

मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये झंझावती प्रचार सुरू केला आहे. राहुल यांच्यामध्ये ‘दम’ आहे आणि ते देशाचे नेतृत्व करण्यात पूर्णपणे सक्षम आहेत, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. राहुल गांधी यांना पप्पू म्हणणे चुकीचे आहे. ज्या पद्धतीने ते गुजरात आणि देशातील इतर भागातील लोकांशी संवाद साधत आहेत. त्यावरून ते देशाचे नेतृत्व करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे स्पष्ट होतय, असे सांगतानाच देशातील जनता सर्वात मोठी शक्ती आहे. ही जनता जेव्हा वाटेल तेव्हा कुणालाही पप्पू बनवू शकते, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

यावेळी राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रवादी कधीच एकत्र येऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाहीत. पण राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत कुणाच्याबाबतीत ठोस काही सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साता-यात २२  वर्षीय युवक कोरोना बाधित, २४ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

News Desk

भारतीय महिलांचा आत्मविश्वास कमी पडला

News Desk

वर्ध्याहून पायी तामिळनाडूला निघालेल्या २२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वाटेत मृत्यू

News Desk